शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

पूरक्षेत्र नद्यांमधील वाळूउपसा करण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:24 AM

शिरोली : कोकण किनारपट्टीपासून कोल्हापूर, सांगलीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे आंबोलीपासून महाबळेश्वरपर्यंत शंभर टीएमसी क्षमतेची धरणे बांधा, ...

शिरोली : कोकण किनारपट्टीपासून कोल्हापूर, सांगलीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे आंबोलीपासून महाबळेश्वरपर्यंत शंभर टीएमसी क्षमतेची धरणे बांधा, पश्चिम महाराष्ट्रातील पूरक्षेत्र नद्यांमधील वाळूउपसा करण्यासाठी हरित लवादाने परवानगी द्यावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

पूरग्रस्तांना भरीव मदत मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जलसमाधी यात्रा काढण्यात आली असून ही यात्रा गुरुवारी हालोंडी येथे आली. या वेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते माजी उपसरपंच अनिल पाटील यांच्या गुऱ्हाळ घरात आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी शेट्टी यांनी शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ प्रमाणेच नुकसानभरपाई तसेच नियमित शेतीकर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेली ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी केली. शिरोलीजवळील सांगली फाटा येथे महामार्गावर उड्डाणपूल उभा करा, शिरोळ तालुक्यात पुलांची उंची वाढवा, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी त्यांनी शिरोली, हालोंडी, नागाव येथील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, करवीर उपाध्यक्ष विक्रम पाटील, हालोंडीचे उपसरपंच महावीर पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप पाटील, सुनील पाटील, वर्धापन बेळंकी, शिरोलीचे उदय पाटील, सूर्यकांत खटाळे, राजू खटाळे उपस्थित होते.

फोटो ओळी :-

कोल्हापूर-सांगली मार्गावर हालोंडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आलेली संघर्ष यात्रा.