शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा मृत्यूचा नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
2
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
3
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
4
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
5
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
6
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
7
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
8
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
10
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
12
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
13
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
14
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
15
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
16
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
17
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
18
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
19
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
20
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

आजपासून व्यापार सुरु करण्यास परवानगी द्या : ललित गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:16 AM

कोल्हापूर : राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर गेल्या आठवड्यात सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्याआधारे पाच दिवस कोल्हापूर ...

कोल्हापूर : राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर गेल्या आठवड्यात सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्याआधारे पाच दिवस कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू राहिला. या कालावधीत कोरोना रूग्णांची संख्या वाढली नाही. त्यामुळे व्यापार सुरू करण्याने कोरोनाचा संसर्ग वाढत नाही, हे व्यापाऱ्यांचे म्हणणे खरे ठरले आहे. म्हणून आज (सोमवार)पासून आमचे सर्व व्यापार सुरू राहतील. त्याला सरकारची परवानगी मिळालीच पाहिजे, असे प्रतिपादन राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची विशेष बैठक रविवारी सायंकाळी असोसिएशनच्या कार्यालयात झाली. या बैठकीत गांधी बोलत होते. ते म्हणाले, प्रायोगिक परवानगीची मुदत शुक्रवारी दुपारी चार वाजता संपल्यानंतर सोमवारपासून पुन्हा व्यापार सुरू करण्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत सर्व व्यापारी आहेत. या परवानगीसंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आदी विविध मान्यवर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्र चेंबरच्यावतीने निवेदनही दिले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण प्रत्यक्षात परवानगीचा आदेश निघालेला नाही, असे व्यापाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच घडत आहे. तरीही व्यापाऱ्यांनी सोमवारपासून आपले व्यापार सुरू करण्याची तयारी केलेली आहे.

या बैठकीला सचिव रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, खजिनदार अनिल पिंजानी, माणिक पाटील चुयेकर, प्रताप पवार, प्रितेश दोशी, स्नेहल मगदूम, अतुल लोंढे, शाम बासराणी, दीपक पुरोहित, भरत रावळ, इंदर चौधरी, आदी संचालक उपस्थित होते.