शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

आंबेडकरी चळवळीची वाटचाल आत्मघाताकडे !

By admin | Published: August 02, 2016 12:26 AM

नवीन फ्रंटची गरज : राजकीय आत्मभान परिषदेतील सूर; अण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य

कोल्हापूर : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ना नेत्यांचे, ना नेते कार्यकर्त्यांचे ऐकतात; अशी राजकीय सद्य:स्थिती आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीची वाटचाल ही आत्मघाताकडे सुरू आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांना तोंड देण्यासाठी समविचारी पक्षांतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नवीन फ्रंट निर्माण करण्याची गरज आहे, असा सूर सोमवारी कोल्हापुरात राजकीय आत्मभान परिषदेत उमटला.या परिषदेला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई, बहुजन समता पार्टीचे सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने, बहुजन समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. ज. रा. दाभोळे, बहुजन ऐक्य चळवळीचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ही परिषद शाहू स्मारक भवनात झाली.डॉ. राजेंद्र गवई म्हणाले, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करीत असताना सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी नव्याने फ्रंट निर्माण केले पाहिजे तसेच राज्यातील डिसेंबर २०१६ मध्ये होणाऱ्या २९७ नगरपालिका व फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या २७ जिल्हा परिषदा निवडणुका या नव्याने होणाऱ्या फ्रंटच्या नेतृत्वाखाली व्हाव्यात.डॉ. मच्छिंद्र सकटे म्हणाले, प्रथम जातिव्यवस्थेचा अंत केला पाहिजे. राजकारण आणि राजकारण्यांना न भिता आपण त्याने भिडले पाहिजे. त्याचबरोबर आज पैशांनी निवडणूक जिंकू शकतो. फ्रंट झाले तर मी तुमच्यासोबत असेन.मच्छिंद्र कांबळे म्हणाले, भाजप हा पक्ष नसून आरएसएसची दुसरी शाखा आहे. सर्व निर्णय नागपूरहून होतात. कन्यागत महापर्व, कुंभमेळ्याला सरकार निधी देते पण, सर्वसामान्य माणूस आणि शेतकरीवर्ग मूलभूत गरजांपासून वंचित आहे. जातीयता वाढत आहे हे धोकादायक आहे. त्यामुळे राजकीय पर्याय उभे करणे आवश्यक बनले आहे. सत्तेच्या जवळ जाण्यासाठी फ्रंट तयार व्हायला पाहिजे. यासाठी आंबेडकरी चळवळीतील गटांनी गट-तट न मानता एकत्र आले पाहिजे. भाजप-शिवसेनेशी लढण्यासाठी आंबेडकर चळवळीतील विविध पक्षांना एकत्र करून चर्चा केली पाहिजे प्रसंगी समविचारी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांबरोबर चर्चा करून त्यांना सामावून घेतले पाहिजे तरच सत्तापरिवर्तन होईल.यावेळी डॉ. ज. रा. दाभोळे यांनीही मत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख यांनी स्वागत तर निमंत्रक अनिल म्हमाने यांनी प्रास्ताविक केले. परिषदेस सोलापूरचे सुबोध वाघमारे, रणजित कांबळे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. चिंतामणी कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)