शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
3
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
4
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
5
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
6
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
7
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
8
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
9
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
10
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
11
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
12
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
13
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
14
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
15
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
16
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
17
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
18
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
19
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
20
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...

करवीर पोलीस ठाण्यासमोर आंबेवाडी ग्रामस्थांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:25 AM

आंबेवाडी गावातील पूरग्रस्तांचे अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी मागणी १९८९ साली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. त्यानंतर वारंवार जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावाही करण्यात ...

आंबेवाडी गावातील पूरग्रस्तांचे अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी मागणी १९८९ साली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. त्यानंतर वारंवार जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला; मात्र पूरग्रस्त ग्रामस्थांचे पुनर्वसन झालेच नाही. त्यामुळे २०१९ मध्ये व पुन्हा जुलै २०२१ मध्ये महापूर आला. त्यावेळी ग्रामस्थांनी पूरग्रस्त भागास भेट देण्यासाठी आलेले मंत्री व प्रशासनास पूरग्रस्तांचे १५ ऑगस्टपूर्वी १०० टक्के पुनर्वसन करावे, अन्यथा स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी व ग्रामस्थ आत्मदहन करतील, असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून सरपंच सिकंदर मुजावर, उपसरपंच वेदांत विटकर, सागर काकडे, आशिष माने, भारत गायकवाड, आदींना करवीर तहसील कार्यालयात चर्चेसाठी बोलवले. तहसीलदार शीतल मुळे-भामरे, करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व करवीर पोलीस उपअधीक्षक आर.आर.पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. लेखी आश्वासन दिल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका सरपंच मुजावर यांनी घेतली. या दरम्यान गावामध्ये सरपंचासह अन्य सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची अफवा पसरली, त्यामुळे शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेकडो ग्रामस्थांनी करवीर पोलीस ठाण्याच्या दारात ताब्यात घेतलेल्यांना सोडावे म्हणून अर्धा तास ठिय्या दिला. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी ग्रामस्थांना ताब्यात घेतले नसल्याचे सांगितल्यावर ग्रामस्थांनी निघून जाण्याचे मान्य केल्यामुळे तणाव निवळला.

फोटो : १४०८२०२१-कोल-आंबेवाडी

आेळी : गेल्या ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासंबंधी करवीर पोलीस ठाण्यात शनिवारी आंबेवाडी सरपंच सिकंदर मुजावर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने चर्चेसाठी पाचारण केले होते.