शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

अंगडिया व्यावसायिकांना सराफ बंदचा फटका

By admin | Published: March 04, 2016 1:03 AM

व्यवसाय कोलमडला : शहरातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान

तानाजी पोवार -- कोल्हापूर  शहरातील सराफ व्यवसाय गेले दोन दिवस बंद आहे. या सराफ व्यावसायिकांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील अंगडिया कुरिअर सर्व्हिसला गेल्या दोन दिवसांत सुमारे ६५ लाखांचा फटका बसला आहे. सराफ व्यवसाय बंद राहिल्याने पर्यायाने अंगडिया सर्व्हिसही पूर्णत: कोलमडली असल्याने बुधवारी काही प्रमाणात सुरू असलेली ही सेवा गुरुवारी बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. याशिवाय जिल्ह्यातील गांधीनगर, इचलकरंजी या ठिकाणीही ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय या व्यावसायिकांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात किमान एक कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती अंगडिया व्यावसायिकांनी दिली.केंद्रीय अबकारी कराच्या निषेधार्थ देशभर सराफ व्यावसायिकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्यामुळे कोल्हापुरातही गेले दोन दिवस सराफ बाजारपेठ बंद स्थितीत आहे. अंगडिया कुरिअर सर्व्हिस पूर्णत: कोलमडली आहे. बुधवार (दि. २) पासून सराफ व्यावसायिकांनी हा बंद पुकारला असला तरी त्या दिवशी सायंकाळी ही सेवा काही प्रमाणात सुरू होती, पण गुरुवारी ही सेवा बंद झाली. दररोज मुंबईला माल रवानाकोल्हापुरातून मुंबई बाजारपेठेत दररोज रात्री नऊ वाजता पार्सल पाठविली जातात. कोल्हापुरातून ११ अंगडिया व्यावसायिकांपैकी किमान सहाजणांचे स्वतंत्र टेम्पो अथवा सुमो या चारचाकी वाहनाने माल पाठविला जातो. इतर व्यावसायिकांचे कर्मचारी कमी माल असल्यास दररोज खासगी बसेस अथवा एस. टी. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करून मुंबईपर्यंत माल पोहोचवितात. गुजरात व इतर ठिकाणी जाणारा माल मुंबईत गेल्यानंतर तेथून वेगवेगळ्या ठिकाणी पाठविला जातो.विश्वास महत्त्वाचाकोल्हापूर शहराच्या सराफ बाजारपेठेतून दररोज किमान ३५ ते ४० लाखांची उलाढाल या अंगडिया व्यावसायिकांमार्फत होते. संपूर्ण व्यवसाय हा विश्वासावरच अवलंबून असल्याने अनेक सराफ व्यावसायिकांचे अंगडिया व्यावसायिकांशी अनेक वर्षांपासूनचे संबंध जुळले आहेत. त्यामुळे प्रत्येक सराफ व्यावसायिक आपला माल पाठविताना ठरावीकच अंगडिया कुरिअर सर्व्हिसकडेच माल देत असतो. यामध्ये विश्वासाचा दुवा महत्त्वाचा मानला जातो.बहुतांश व्यावसायिक परप्रांतीयकोल्हापूर शहरातील सराफ बाजारपेठेत अंगडिया सर्व्हिसमध्ये फक्त एकच महाराष्ट्रीय असून बाकी सर्व व्यावसायिक हे परप्रांतीय आहेत. तरीही या अंगडिया व्यावसायिकांवर सराफ व्यावसायिकांचा विश्वास जडला आहे, पण अनेक वेळा यातून धोकाही निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.मालाचे दरसराफ बाजारपेठेतून दागिने पाठविताना चांदीचा दर हा किलोवर, तर सोन्याचा दर हा किमतीवर आकारला जातो. चांदीच्या एक किलोच्या दागिन्यावर १०० रुपये, तर सोन्याच्या एक लाखाच्या दागिन्यावर १५० ते २०० रुपयांपर्यंत दर आकारला जातो.