शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

लोकसभा अन् विधानसभेच्या भाजप सर्वाधिक जागा जिंकणार, चित्रा वाघ यांनी केला दावा

By भारत चव्हाण | Published: December 14, 2022 2:00 PM

महाविकास आघाडी सरकार सक्षम, संवेदनशील नव्हते. शिंदे-फडणवीस सरकार सक्षम

कोल्हापूर : भाजपने लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २००च्या वर जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये महिला मोर्चाचे योगदान राहिल असा विश्वास भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. वाघ या आज, बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना वाघ म्हणाल्या, भाजपचे महिला संघटन वाढविण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची आजपासून सुरुवात केली आहे. प्रत्येक बुथवर २५ महिला कार्यकर्त्यांचे जाळे दिसेल असेही त्यांनी सांगितले.

लव्ह जिहादची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुध्दा लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यापूर्वीच आम्ही ही मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार, बलात्कार, विनयभंगाचे प्रकार घडत होते. परंतू ते सरकार सक्षम, संवेदनशील नव्हते. आजही राज्यात अशा घटना घडत आहेत. परंतु शिंदे-फडणवीस सरकार सक्षम आहे. काही महिन्यात डझनभर पोलिसांना निलंबित केले. तर अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला.शक्ती कायद्याचे आम्ही यापूर्वीही स्वागत केले आहे. त्याची मागणी आम्ही पहिल्यापासून करत होतो. त्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या दुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे या कायद्याचा महिलांना, मुलींना फायदाच होईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी महिला मोर्चच्या जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक, गायत्री राऊत, महेश जाधव, महानगर जिल्हध्यक्ष राहूल चिकोडे, अजित ठाणेकर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLove Jihadलव्ह जिहादChitra Waghचित्रा वाघ