शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

काहीही झाले तरी समितीचाच महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:53 AM

बेळगाव : राष्ट्रीय पक्षांनी यावेळी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय पक्षांना महागात आणि समितीला फायद्यात पडणार आहे, असे ...

बेळगाव : राष्ट्रीय पक्षांनी यावेळी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय पक्षांना महागात आणि समितीला फायद्यात पडणार आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिक आणि राष्ट्रीय पक्षांना कायम मतदान करणारे मतदारही हे बोलून दाखवत आहेत. पक्षाचे चिन्ह पाहून मतदान केले तरी कोणताही पक्ष स्वतंत्रपणे सत्ता स्थापन करू शकत नाही. यामुळे पक्षांच्या निर्णयाबद्दल सध्या उलटसुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.

यापूर्वी बेळगाव मनपाची निवडणूक कन्नड विरुद्ध मराठी अशी होत होती. भाषिक वादाची ठिणगी पडली की दोन्ही बाजूंनी मतदान जोरात व्हायचे आणि निवडून आल्यानंतर सर्व मराठी एकीकडे आणि सर्व कन्नड दुसरीकडे अशी परिस्थिती असायची. उर्दू नगरसेवकांना जमेला धरून जास्तीतजास्त वेळा मराठीची आणि काहीवेळा कन्नडची सत्ता आलेली उदाहरणे आहेत. मात्र आता सर्व पक्ष एकमेकांच्या विरुद्ध अशी निवडणूक होत असून, समितीचे मराठी उमेदवार या दोघा-तिघांच्या भांडणात फायदा करून घेणार आहेत, असे चित्र आहे.

आताही सर्व राष्ट्रीय पक्ष एकत्र येऊ शकतील आणि सर्व कन्नड नगरसेवक येऊन सत्ता स्थापन करतील की काय, अशी एक शक्यता आहे. पण याला पक्षीय धोरणे सर्वप्रथम आडवी येणार आहेत. काँग्रेस आणि एमआयएम कधीच एक येऊ शकत नाहीत, कारण काँग्रेसशी युती करणार नाही, हे एमआयएमचे धोरण कायम आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे राज्यातील युती सरकार पडले आहे. यामुळे महानगरपालिका असो वा ग्रामपंचायत, हे दोन्ही पक्ष कानाला खडा लावून बसले आहेत. काहीही झाले तरी हे दोन्ही पक्ष एकत्र येणे कठीण आहे.

भाजप आणि काँग्रेस हे दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. हे दोघे कधीच एकत्र येणे कठीण आहे. आम आदमी पार्टीने कुणाशीही युती नाही, हे यापूर्वीच जाहीर केले आहे आणि भाजपशी कधीच आप, एमआयएम या पक्षांची युती होऊ शकत नाही.

समजा सर्व पक्ष एकत्र आले, तरी त्यांनी दिलेल्या मराठी आणि हिंदू उमेदवारांची फरफट होणार आहे. महाराष्ट्रात सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केलेल्या शिवसेनेला नाव ठेवण्याची सोय भाजपला राहणार नाही, यामुळे भाजपला आपले स्वतंत्र अस्तित्व राखावे लागेल.

समिती या संघटनेने आपले ४० प्लसचे धोरण आखले आहे. हे पूर्ण यशस्वी झाले, तर बाकीच्यांनी कितीही युती केली, तरी फरक पडणार नाही. समितीला समजा मॅजिक फिगर तयार करण्यासाठी उमेदवार कमी पडले, तर ते मराठी भाषिक अपक्ष उमेदवारांशी हातमिळवणी करू शकतात. यातच भाजपने बंडखोरी केलेल्या उमेदवारांवर ऐनवेळी कारवाई करून गोंधळ घातला असून, भाजपकडून कारवाई झालेले नाराज सहानभुतीवर निवडून आले, तर इतरत्र कोठे म्हणजे काँग्रेसकडे न जाता भगव्याच्या सत्तेसाठी समितीकडे येऊ शकतात.

राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकीत सर्वांचा कौल भाजपकडे असला, तरी स्थानिक पातळीवर नाराजी आहे. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.