शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापूर महापालिकेचा कारभार संथ, नोकर भरतीस मंजूरी द्या; आमदार जयश्री जाधव यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी 

By विश्वास पाटील | Updated: October 3, 2023 16:42 IST

नागरिकांची मोठी गैरसोय

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील कामकाज संथ सुरु असून नोकर भरतीच्या आकृतीबंधास तातडीने मंजूरी द्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.महापालिका प्रशासनाने सुमारे 5 हजार 44 इतक्या पदांचा नवीन आकृतीबंध  नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या आकृतीबंधात माहूर, गाडीवान, लेबर यांच्यासह इतर कालबाह्य 465 पदे रद्द करण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात शिपाई पदे रद्द केली आहेत. नव्याने 400 पदांची निर्मिती केली आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर, सिस्टीम मॅनेजर, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतर पदांचा समावेश आहे. या आकृतीबंधाला नगरविकास विभागाने मंजुरी दिली नसल्याने महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कारभार संथ गतीने सुरू असून, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.या आकृतीबंधास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी अधिवेशनात लक्षविधीद्वारे केली होती. या लक्षवेधी प्रश्नास नगर विकास विभागाने उत्तर दिले असून, यामध्ये महानगरपालिकेने सादर केलेल्या  आकृतीबंधाची तपासणी करण्यात येत आहे. सन 2023 करता केवळ एक वेळची बाब म्हणून आस्थापना खर्चाच्या 35 टक्के मर्यादाची अट शिथिल करून अत्यावश्यक अत्यंत गरजेचे पदे भरण्याचे निर्देश महापालिकेस देण्यात आल्याचे नमूद केले आहे. मात्र,  यामधून महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार गतिमान होणार नाही.नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तसेच कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आकृतीबंधाला मंजुरी देणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर विकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास त्वरित मंजुरी द्यावी असे आमदार जाधव यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर