शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी अविनाश भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:12 IST

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नाशिकचे अ‍ॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे अमोल सावंत, तर बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या सदस्यपदी सतीश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. कोल्हापूरच्या विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुधवारी मुंबईच्या बार कौन्सिलच्या कार्यालयात ही निवड झाली.

ठळक मुद्देउपाध्यक्षपदी अमोल सावंत, बार कौन्सिल आॅफ इंडिया सदस्य सतीश देशमुखमुंबईच्या कार्यालयात झाली निवड : विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी

कोल्हापूर : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नाशिकचे अ‍ॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे अमोल सावंत, तर बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या सदस्यपदी सतीश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. कोल्हापूरच्या विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुधवारी मुंबईच्या बार कौन्सिलच्या कार्यालयात ही निवड झाली.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणूक रिंगणात २५ जागांसाठी राज्यातून १६४ उमेदवार उभे होते; त्यासाठी ५९ हजार सदस्यांनी मतदान केले. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पार पडलेल्या निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतून १७ उमेदवारांनी निवडणूक लढविली.

या उमेदवारांना राज्यभरातून वकिलांनी मतदान केले. ५ मे २०१८ पासून जिल्हानिहाय मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीला १० महिन्यांचा कालावधी लागला. बुधवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांची निवड करण्यात आली. कमिटीचा पाच वर्षांचा कार्यकाल आहे.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारीअध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे (नाशिक), उपाध्यक्ष अमोल सावंत (औरंगाबाद), बार कौन्सिल अ‍ॅड इंडिया सदस्य सतीश देशमुख (हिंगोली), वेल्फेअर सदस्य विवेक घाटगे (कोल्हापूर), सदस्य आशिष देशमुख (पुसद-यवतमाळ), गजानन चव्हाण (ठाणे), विठ्ठल देशमुख (मुंबई), परिजात पांडे (नागपूर), राजेंद्र उमाप (पुणे), जयवंत जयभावे (नाशिक), हर्षद निंबाळकर (पुणे), अविनाश आव्हाड (पुणे), संग्राम देसाई (सिंधुदुर्ग), वसंत साळुंखे (औरंगाबाद), मोतीसिंग मोहता (अकोला), आनंदराव पाटील (लातूर), असिफ कुरेशी (नागपूर), उदय वारूंजकर(मुंबई), मिलिंद पाटील (उस्मानाबाद), मिलिंद थोबडे (सोलापूर), अनिल गोवरदिपे (नागपूर), सुभाष घाटगे (मुंबई), सुदीप पासबोला (ठाणे), वसंतराव भोसले (सातारा), अहमदखान पठाण (पुणे).पूरग्रस्त वकिलांना मदतकोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त वकिलांना मदत मिळावी, यासाठी अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी बार कौन्सिलकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्याला तत्वत: मान्यता देत सुरुवातीला साडेसात लाख रुपये मंजूर करून ते दिले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर