शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

सावधानताच घालेल अपघाताला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:42 AM

घन:शाम कुंभार : यड्राव राष्ट्रीय रस्ते वाहतूक सुरक्षा अभियान सुरू आहे; परंतु सर्वांचाच बेजबाबदारपणा अपघातास कारणीभूत ठरत आहे. अपघातामध्ये ...

घन:शाम कुंभार : यड्राव राष्ट्रीय रस्ते वाहतूक सुरक्षा अभियान सुरू आहे; परंतु सर्वांचाच बेजबाबदारपणा अपघातास कारणीभूत ठरत आहे. अपघातामध्ये हकनाक जाणाऱ्या बळींना जबाबदार कोण, असा प्रश्न समोर येत असला तरी वाहतुकीमध्ये सुरक्षितता येण्यासाठी वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे होणारे काटेकोर पालन वाहतूक शाखेकडून प्रबोधनासह कडक शिस्तच रस्ते अपघाताचे प्रमाण घटवेल व हकनाक बळींना आळा बसेल. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे; परंतु नुकत्याच झालेल्या अपघातामध्ये रेंदाळच्या भाजीविक्रेत्या दाम्पत्यासह हेल्मेटअभावी युवकांनाही प्राण गमवावे लागले. त्यामुळे परिवारापुढे निर्माण झालेल्या प्रश्नांचे जाळे कोणतेही कारण नसताना ओढावलेल्या संकटाची भयानकता दर्शविते.

प्रत्येकाला वेळ महत्त्वाचा वाटत असल्याने वाहनाच्या वेगाकडे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आमचे काही देणे लागत नाही, या आविर्भावात असल्याने त्यांचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष, तर रस्ते वाहतूक नियंत्रण विभाग 'वाहतूक सुरक्षा अभियान' प्रारंभीचा कार्यक्रम उत्सवाप्रमाणे साजरा करण्यापलीकडे जास्त लक्ष घालत नाहीत.

अपघातामध्ये गेलेल्या जिवाला नुकसान भरपाई मिळेल अथवा न मिळेल, परंतु त्यांची निर्माण झालेली पोकळी नुकसान भरपाईच्या रकमेतून भरेल का, नुकत्याच अपघातामध्ये मृत पावलेल्या स्वप्नाली कुंभार यांच्या मुलाला माया, ममता मिळेल का, तर ज्यांचा काही संबंध नाही, त्यांना अशी मोठी शिक्षा का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. घरच्या कर्त्याचा जीव गेला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. काही घटनांमध्ये मुले अपघातग्रस्त झाल्याचे पालकांना पाहावे लागते.

रस्ते वाहतूक विभागाने वाहतूक नियमांच्या कडक अंमलबजावणीकडे लक्ष देणे, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविणे, वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे व सावधानता बाळगणे सर्वांच्याच हिताचे आहे; अन्यथा अपघातास सर्वच घटक जबाबदार राहतील.

कोट - वाहनधारकांनी मद्यपान न करता वाहतुकीचे नियम काटेकोर पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. वाहनधारकांना स्वत:बरोबर इतरांचीही सुरक्षितता महत्त्वाची वाटावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- नंदकुमार मोरे, सहायक पोलीस निरीक्षक इचलकरंजी