शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बदलला पक्ष तरी आमदारकी फिक्स; कोल्हापूर जिल्ह्यात सहा जणांना मिळाले यश

By पोपट केशव पवार | Updated: October 25, 2024 19:14 IST

पोपट पवार कोल्हापूर : उमेदवारापेक्षा पक्ष कोणता हे पाहून अनेक मतदार आपला कौल ठरवत असतात. त्यामुळे उमेदवारांनी इकडून तिकडे ...

पोपट पवारकोल्हापूर : उमेदवारापेक्षा पक्ष कोणता हे पाहून अनेक मतदार आपला कौल ठरवत असतात. त्यामुळे उमेदवारांनी इकडून तिकडे उड्या मारणे अनेकांना रुचत नाही. निकालात याची प्रचिती राज्यात बहुतांश मतदारसंघांत दिसते. काही मतदारसंघ मात्र याला अपवाद आहेत. उमेदवाराने निवडणुकीत पक्ष बदलल्यानंतरही कोल्हापूर जिल्ह्यातील सहा उमेदवारांनी गुलाल घेतला आहे. बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक, अमल महाडिक, उल्हास पाटील यांनी पक्ष बदलूनही जनतेने त्यांना दुसऱ्या पक्षातून उभे राहिल्यानंतर विधानसभेत पाठवले आहे.खानविलकर यांना राष्ट्रवादीतून यशदिग्विजय खानविलकर हे १९८०, ८५, ९० व ९५ असे चारवेळा काँग्रेसमधून आमदार होते. शरद पवार यांचे ते जवळचे निकटवर्तीय. १९९९ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढे १९९९ला त्यांनी राष्ट्रवादीतून विजय प्राप्त केला.

‘हात’ सोडून घड्याळावरही कुपेकरांची जादूगडहिंग्लजमधून १९९५ला काँग्रेसच्या चिन्हावर विधानसभेत गेलेले बाबासाहेब कुपेकर यांनी १९९९ला राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधत निवडणूक लढवली. पक्ष बदलूनही गडहिंग्लजकरांनी त्यांना गुलाल लावला.

सदाशिव मंडलिक यांचा करिष्माकागल मतदारसंघातून १९७२ला अपक्ष विजय मिळवलेल्या सदाशिवराव मंडलिक यांनी १९८५ मध्ये एस काँग्रेसकडून विधानसभा गाठली. पुढे १९९० व १९९५ला त्यांनी काँग्रेस आयमधून विजय मिळवला. विशेष म्हणजे काँग्रेसला रामराम करत ते १९९९ व २००४ला राष्ट्रवादीकडून लोकसभेत गेले. पुढे २००९ला अपक्ष विजय मिळवत त्यांनी पक्षापेक्षा स्वत:चाच करिष्मा असल्याचे सिद्ध केले होते.

ऐनवेळी भगवा घेत उल्हास पाटील यांचा विजयशिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कार्यरत असणाऱ्या उल्हास पाटील यांनी २०१४ मध्ये निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश करत विजय मिळवला होता. स्वाभिमानीचा झेंडा सोडून ऐनवेळी भगवा खांद्यावर घेत त्यांनी मिळवलेला विजय पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चिला गेला.

अमल महाडिक यांचा विजय

अमल महाडिक हे २०१४च्या निवडणुकीआधी काँग्रेसकडून भादोले (ता. हातकणंगले) जिल्हा परिषदेचे सदस्य होते. निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून विजयश्री प्राप्त केली.

कोरे, पाटील यांची बाजीचंदगडमूधन १९९०ला काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत गेलेले नरसिंग पाटील हे १९९९ला राष्ट्रवादीकडून तर २००४ला ‘जनसुराज्य’कडून लढले व विजयी झाले. १९९९ला राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून पन्हाळा मतदारसंघातून विजयी झालेले विनय कोरे पुढे २००४ला स्वत:च्या जनसुराज्यकडून आमदार झाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरPoliticsराजकारण