शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पाऊस वाढविणार बळिराजाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:27 AM

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाच्या उघडिपीचा कालावधी लांबण्याची चिन्हे दिसत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आठवडाभर पाऊस उघडीप घेणार आहे. ...

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाच्या उघडिपीचा कालावधी लांबण्याची चिन्हे दिसत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आठवडाभर पाऊस उघडीप घेणार आहे. त्यामुळे बळिराजाला आता आभाळाकडे डोळे लावून बसावे लागणार आहे. रविवारी दिवसभर आभाळ एकदम उन्हाळ्यासारखे निरभ्र झाले. शनिवार दिवसभरातून एखाद दुसरी किरकोळ का असेना, पण सर येत होती, त्यामुळे पिकांना पण जीवदान मिळत होते.

रविवारी मात्र दिवसभर पावसाचा एक थेंबही पडला नाही. कडकडीत उन्हामुळे मात्र घामेघूम होण्याची वेळ आली. आता हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील शनिवारी (दि. २८) ला पाऊस येईल. त्यामुळे हा संपूर्ण आठवडा पावसाची प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचे दर्शन दुर्मीळ होणार आहे. सध्या महापुरातून वाचलेली पिके तरारली आहेत. सोयाबीन व भुईमूग शेंगा भरत असल्याने पावसाची गरज आहे. नवीन उसाच्या लावणीही सुरू आहेत. जमिनीतील ओलीवर लावण आटोपली जात आहे; पण पाऊस थांबल्याने त्याच्या उगवणीवर परिणाम होण्याची भीती आहे. नदीकाठावरील कृषीपंपाच्या वीज जोडण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. महापुरामुळे डीपी व खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे नद्यामध्ये पाणी असतानाही शेतकऱ्यांना पावसावरच विसंबून राहावे लागत आहे. पण, आता तर पावसात मोठा खंड पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.