शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

जलसमाधीसाठी बळीराजाची नृसिंहवाडीकडे कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:52 AM

कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना तातडीने ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांकडे ...

कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना तातडीने ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथून बुधवारी पदयात्रेला सुरुवात झाली. पंचगंगा संगमावरील दत्त मंदिरात सकाळी आठ वाजता शेट्टी यांच्याहस्ते अभिषेक झाला. त्यानंतर स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी जलसमाधी आंदोलनासाठी नृसिंहवाडीकडे पदयात्रेने कूच झाले.

पदयात्रा पाच दिवस पंचगंगा काठावरील पूरग्रस्त गावातून जाईल. यात्रेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी होण्याच्या तयारीने पाठीला बॅग अडकवून आले होते. महिला, तरुणांचा सहभागही लक्षवेधी राहिला. दत्त मंदिरातून पदयात्रा प्रयाग चिखलीत आल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा थांबून ग्रामस्थांनी स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. पुराचा सर्वाधिक फटका बसलेेले हे गाव असल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आमच्यासाठी कोणीतरी लढत आहे, हे प्रकर्षाने दिसले. एका गावाहून दुसऱ्या गावात पदयात्रा जशी पोहोचत राहिली, तशी गर्दी वाढत राहिली. वाटेवरील सर्वच गावांनी पदयात्रेचे जल्लोषी स्वागत केले. आंबेवाडीतून पदयात्रा वडणगे येथे दीड वाजता पोहोचली. तेथील पार्वती मंदिरात ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली होती. तेथे जेवण करून दुपारी तीन वाजता पदयात्रा निगवे, भुयेमार्गे जात शिये येथे मुक्काम करण्यात आला.

पदयात्रेत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिदंर पाटील, सावकर मादनाईक, संघटनेचे जिल्हाध्यक्ष जर्नादन पाटील, सागर शंभूशेठे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, अजित पोवार, सचिन शिंदे, राजगोंड पाटील, वैभव कांबळे यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

चौकट

प्रमुख मागण्या अशा :

२०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करा, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळचा भराव कमी करून तातडीने कमान पूल बांधावे, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा, महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे, त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे, सामायिक खातेदार असणाऱ्या कर्जदारांचे पंचनामे होत नसल्याने कर्ज खाते ग्राह्य धरून नुकसानभरपाई द्यावी.

चौकट

शेट्टींमुळेच उसाला दर

सर्वच राजकीय पक्षांनी आमचा वापर करून घेतला आहे. पक्षाचे नेते पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे

सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून यापुढे आम्ही शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांच्या पाठीशीच राहणार असल्याचे बाळासाहेब वरूटे, राजू पाटील यांच्यासह प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील काही वक्त्यांनी सांगितले. शेट्टी यांच्यामुळेच ७०० रुपये प्रतिटन उसाचा भाव तीन हजारांपर्यंत कारखानदारांना द्यावा लागला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चौकट

पदयात्रेचा आजचा

मार्ग असा

आज, गुरुवारी सकाळी आठ वाजता शिये येऊन पदयात्रेला प्रांरभ होईल. तेथून शिरोली, हालोंडी, हेर्लेमार्गे जाऊन चोकाक येथे पदयात्रेचा मुक्काम होईल.