शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
3
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
4
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
5
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
6
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
7
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
8
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
9
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
10
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
11
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
12
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
13
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
15
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
16
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
17
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
18
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
19
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
20
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती

चुरशीची लढाई; पण वैयक्तिक टीका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:07 AM

मी पाहिलेली व माझ्या आठवणीत राहणारी निवडणूक म्हणजे १९७७ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीने झालेली शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार ...

मी पाहिलेली व माझ्या आठवणीत राहणारी निवडणूक म्हणजे १९७७ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीने झालेली शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार दाजिबा देसाई व कॉँग्रेसचे उमेदवार शंकरराव माने यांच्यातील लढत. आणीबाणीनंतरची पहिलीच निवडणूक असल्याने वातावरण उत्साही व जोशपूर्ण होते.त्या काळात कोल्हापूर शहर म्हणजे ‘शेकाप’चा बालेकिल्ला होता. तसेच डाव्या विचारसरणीचे पुरोगामी शहर म्हणूनही याकडे पाहिले जायचे. कोल्हापूर मतदारसंघातील दाजिबा देसाई व शंकरराव माने यांची निवडणूक आपण जवळून पाहिली आहे. त्यावेळी मी अवघ्या विशीत होतो. त्या काळात सध्यासारखी हायटेक प्रचार यंत्रणा नव्हती. प्रचारासाठी रात्ररात्र जागून एक ग्रुप आपल्या भागातील मोक्याच्या जागी असणाऱ्या भिंती निवडत असे. त्यात मीही होतो. स्वत: घरी तयार केलेला चुना, झाडूचा ब्रश करून निवडलेल्या भिंतींवर ‘शेकाप’ लिहून ती जागा आरक्षित केली जायची. त्यानंतर सुंदर अक्षर असलेला कार्यकर्ता या भिंतीवर उमेदवाराचे नाव, चिन्ह काढून त्याखाली ‘कोल्हापूरच्या विकासासाठी यांनाच विजयी करा’ असे लिहीत असे.आणीबाणीनंतरची पहिलीच निवडणूक असल्याने वातावरण उत्साही व जोशपूर्ण होते. निवडणूक चुरशीची असली तरी प्रचारामध्ये एक मर्यादा व संयम होता. आजच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचे चारित्र्यहनन व वैयक्तिक पातळीवर होणारी टीका, त्या काळात नव्हती. अतिशय सुसंस्कृत व शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवार व कार्यकर्तेही आपल्या उमेदवारासाठी जिवाचे रान करीत होते. प्रचारसभेतही उमेदवार व प्रमुख वक्ते एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख करीत होते. एकमेकांचा उद्धारही करीत नसत. प्रचारात प्रामुख्याने मतदारसंघाचा विकास, महागाईसह, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी कशा सोडविल्या जातील, हे सांगितले जात होते. सध्या प्रचारात विकासाचे मुद्दे कमी व बोचरी टीका जास्त होत आहे. त्या काळात गल्लीगल्लींतून, बोळांतून ‘....यांना निवडून द्या’ अशा घोषणा देत फिरणारा बालचमूही सर्वांचे लक्ष वेधत होता. त्यावेळी पक्षाचे नेते, उमेदवार व कार्यकर्ते यांची पक्षनिष्ठा ही वाखाणण्यासारखी होती. ‘जीव गेला तरी चालेल; पण पक्ष बदलणार नाही,’ अशा नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कडवी फौज ही उमेदवाराला ताकद देणारी होती. सध्या कार्यकर्ते व उमेदवारांची पक्षनिष्ठा शोधावी लागते. या काळात दाजिबा देसाई व शंकरराव माने यांच्यातील चुरशीची लढत चांगलीच गाजली. यामध्ये दाजिबा देसाई यांनी १६५ मतांनी विजय मिळविला.अरुण सावंत, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन