शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

धरणग्रस्तांच्या त्यागातून फुलले चित्रीचे सौंदर्य : पर्यटकांचे लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 1:01 AM

गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने

कृष्णा सावंत ।आजरा : गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्प तुडुंब भरला आहे. चहूबाजूने असलेला डोंगर, धरणाच्या खाली असलेली शेती हिरवाईने नटलेली असल्याने चालूवर्षी प्रकल्पाचे सौंदर्य भलतेच खुलले आहे. प्रकल्पापासून ते आवंडी धनगरवाड्यापर्यंत ३०० हेक्टरमध्ये पाणी साठल्याने प्रकल्पाला समुद्राचे स्वरूप आले आहे.

प्रकल्पाच्या खाली असलेली शेती हिरवाईने नटली आहे. भात रोपांचे मोठे वाफे हिरवाईने प्रकल्पावरून पाहताना मनमोहरून जाते. सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पाऊस यामुळे पर्यटक अल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत आहेत. यावर्षीच्या फुललेल्या सौंदर्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. कोल्हापूरसह सातारा, सांगली, मुंबई, गोवा, पुणे येथील पर्यटक प्रकल्पाचा आस्वाद घेत आहेत. हा प्रकल्प साकारण्यासाठी आणि शंभर टक्के पुनर्वसनासाठी आवंडी, रायवाडा आणि गावठाणवाडी (आताचा चित्रानगर) येथील धरणग्रस्तांनी १९९२ पासून सन २००० पर्यंत संघर्ष केला. त्यामुळे चित्रीच्या सौंदर्याच्या समृद्धीबरोबरच पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीला पाणी मिळाले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा संसार फुलला.

कर्नाटकातील संकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याचे पाणी मिळाले. त्यामुळे चित्री धरणग्रस्तांच्या त्यागामुळे चित्रीचे सौंदर्य नटलेच, सोबत अनेकांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली.तालुक्यातील पाच हजार हेक्टर बहरलेचित्री प्रकल्पाचा आजरा तालुक्याला कमी लाभ झाला; परंतु गडहिंग्लज तालुक्यातील पाच हजार हेक्टर शेती ओलिताखाली येऊन सर्वसामान्य शेतकºयांचे जीवन फुलले. आजरा, गडहिंग्लज आणि कर्नाटकातील शेतकºयांचे जीवनमान २२५ धरणग्रस्तांच्या त्यागामुळे खºया अर्थाने फुलले.इटे ते प्रकल्पापर्यंत रस्त्याची गरजइटे फाटा ते चित्री प्रकल्पापर्यंत चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांसह पर्यटकांनाही यात्रा त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण होण्याची गरज व्यक्त होत आहे.रोजगार निर्मितीला संधीप्रकल्पामुळे चित्रीचे सौंदर्य व अनेकांचे जीवनमानही नटले आहे. चित्रीवर येणाºया पर्यटकांची संख्या पाहता रोजगार निर्मितीला संधी आहे. या ठिकाणी हॉटेल, विश्रामगृह, चहा-नाष्टा सेंटर, आदी व्यवसायांना चालना मिळू शकते.