शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Kolhapur: गवंडी काम सोडले, 'मधुमक्षिका पालनातून लाखो रुपये कमवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 19:36 IST

दुर्वा दळवी  कोल्हापूर : सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव सध्या मधाचे गाव म्हणून ओळखले जात आहे. ...

दुर्वा दळवी कोल्हापूर : सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव सध्या मधाचे गाव म्हणून ओळखले जात आहे. या गावातील ग्रामस्थ मधाचे उत्पादन घेऊन वर्षाकाठी लाखो रुपये कमावित आहेत. भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे निसर्गरम्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल गाव. पाटगाव अंतर्गत शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी या गावात ही मधमाशा पालन उद्योग केला जातो. वर्षभरात साधारण पणे ८ ते १० टन मधाचे उत्पादन घेतले जाते. याच ठिकाणचे मधपाळ धर्माजी कांबळे हे आज पूर्णवेळ मधाचे उत्पादन घेत असून त्यांचे वार्षिक नफा तीन ते चार लाख इतका कमावतात. धर्माजी पूर्वी गवंडी काम करत होते त्यासोबत ते मधमाशी पालन करून मधाचे उत्पादन घेत असत. खादी ग्रामोद्योग यांच्या मार्फत त्यांना मध उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून पूर्णवेळ मधाचे उत्पादन ते घेत आहेत. या व्यवसायातून वर्षाकाठी सुमारे 450 ते 500 किलो मधाची निर्मिती धर्माजी करतात. निसर्गसंपन्न परिसर असल्याने शुद्ध आणि नैसर्गिक मधाचे उत्पादन धर्माजी घेत असून या मधाला राज्यासह देशात ही मागणी वाढली आहे. धर्माजी यांच्याप्रमाणे पाटगाव येथील अनेक शेतकरी, ग्रामस्थ मधाचे उत्पादन घेऊन चांगला नफा ही मिळवतात अन् बाजारात या मधाला मागणी ही अधिक आहे. मधाचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पाटगावने अनेकांना मध निर्मितीतून वेगळी ओळख दिली आहे. एकेकाळी गवंडी काम करणारे धर्माजी शुद्ध मधाचे उत्पादन घेऊन चांगला नफा कमवू लागले आहेत. त्यामुळे मध निर्मिती ही नव्या व्यवसायाची संधी ग्रामीण भागातील युवकासाठी उपलब्ध झाली आहे. 

मध निर्मिती ते वसाहत निर्मितीधर्माजी स्वतः मधाचे उत्पादन घेत असून यातून त्यांना चांगला नफा ही मिळत आहे. मधपाळ म्हणून काम करणाऱ्यांना ते मधुमक्षिका पालन कसे करावे याचे प्रशिक्षण ही देतात. तसेच मधमाश्यांच्या वसाहती निर्माण करून त्यांनी आजवर 100 हून अधिक वसाहतींची विक्री केली आहे. 

समाजात मधपाळ म्हणून मान सन्मान मिळालाएकेकाळी गवंडी काम करणारे धर्माजी आज मध निर्मितीत अग्रेसर ठरले आहेत. नव्या व्यवसायाने त्यांना एक नवी ओळख मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मध निर्मितीतून निसर्ग संवर्धनासाठी मोलाचा वाटा उचलण्याची संधी मिळते या कार्याचा त्यांना अभिमान वाटतो. - धर्माजी कांबळे, मधपाळ, अंतूर्ली

टॅग्स :kolhapurकोल्हापूर