शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

देशाला विश्वगुरू होण्याआधी विश्वमित्र बनावे लागेल : रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:50 IST

'निरक्षरता, गरिबी, भूकबळी या समस्यांचे आव्हान असणाऱ्या भारत ७५ आणि वेगाने पुढे जाणाऱ्या इंडिया ७५ यांच्यातील दरी आधी संपवावी'

कोल्हापूर : भारताची अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु ही वाढ नुसतीच नको. निरक्षरता, गरिबी, भूकबळी या समस्यांचे आव्हान असणाऱ्या भारत ७५ आणि वेगाने पुढे जाणाऱ्या इंडिया ७५ यांच्यातील दरी आधी संपवावी. देशाला विश्वगुरू होण्याआधी विश्वमित्र बनावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार, शिवभक्त, शिक्षक सु. रा. देशपांडे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. माशेलकर यांना सु. रा. देशपांडे स्मृती गौरव पुरस्कार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.डॉ. माशेलकर म्हणाले, भारतातील टायर थ्री शहरात राहणारे ५० टक्के नागरिक अजूनही गरीब आहेत. शंभरपैकी फक्त २४ महानगरेच विकसित झालीत. देशातील प्रत्येक सहावी व्यक्ती झोपडपट्टीत राहते. सहापैकी एक व्यक्ती अजूनही निरक्षर आहे. १५ टक्के लोक गरीब आहेत. हा बदल झाला तरच देश विश्वगुरू बनेल. एकीकडे नवीन पिढीच्या आकलनाचा वेग इतका मोठा आहे, की त्यांच्यासाठी शिक्षकांची कमतरता भासणार आहे, दुसरीकडे हुशार मुलांना गरिबीमुळे, तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध न झाल्यामुळे आत्महत्या करावी लागते.

नव्या भारताचे सूत्रडॉ. माशेलकर यांनी नवा भारत कसा असावा याचे सूत्र मांडले. संतुलित, स्त्री-पुरुषांना समान संधी असलेला, जातीपातीच्या पलीकडच्या भारताची संकल्पना मांडली. यामध्ये सांस्कृतिकतेचा अभिमान असलेला, इतर धर्माचा आदर करणारा, शिक्षणाचा योग्य मार्ग आणि अधिकार, नुसते श्रीमंत, गरिबीची दरी वाढवणारी समृद्धी नको, कुपोषणमुक्त, योग्य अन्नाचे पोषण आणि आनंदी असणारा समाज अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर