शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समिकरणं बदलणार? 
2
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
3
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
4
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
5
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
6
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
7
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
8
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
9
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
10
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
11
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
12
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
13
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
14
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
15
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
17
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
19
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
20
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

सावधान, ४३ गावांत पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:17 AM

कोल्हापूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. या वेळच्या ...

कोल्हापूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. या वेळच्या अहवालात जिल्ह्यातील ४३ गावांतील पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. या गावांतील पिण्याचे पाणी आजारपणाचे कारण ठरू शकते, असे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे.

पिण्याचे पाणी दूषित, गढूळ झाल्यास गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार, उलटी, पोटाचे विकार असे आजार होतात. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या आजाराचे रुग्ण वाढत असतात. यावेळीही असेच चित्र आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क राहून जनजागृती करीत आहे; पण कोरोनाची लाट अजूनही कायम असल्याने आरोग्य प्रशासनाचे इतर साथीचे आजार, जलजन्य आजार नियंत्रणात आणण्याकडे दुर्लक्ष होत आहे. जून महिन्यात घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यात ४३ गावांत पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे.

१) किती नमुने घेतले तपासणीसाठी? - १०५३

किती गावांतील नमूने दूषित - ४३

२) तालुकानिहाय आढावा

तालुका नमुने घेतले दूषित नमुने आढळले

आजरा ६६ ०

भुदरगड ७७ ८

चंदगड १२२ ६

गडहिंग्लज १२८ ८

कागल ६० ४

हातकणंगले ९० ०

पन्हाळा ६५ ४

राधानगरी ७५ ०

शाहूवाडी १४९ ६

शिरोळ १२२ ३

करवीर ९१ ७

गगनबावडा ८ ०

३) शहरी भागात ४६ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

गडहिंग्लज, शिरोळसह जिल्ह्यातील विविध शहरांत ४६ ठिकाणचे पिण्याचे पाणी दूषित आहे. त्याठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेस दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची यंत्रणा पाणी शुद्धीकरणासाठीची कार्यवाही करीत आहे.

४) अहवाल मिळण्यास विलंब

गावपातळीवर जलसुरक्षा रक्षक आणि आरोग्य सेवकांतर्फे पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन जिल्हा, गडहिंग्लज, कोडोली, सोंळाकूर, शिरोळ येथील प्रयोगशाळेकडे पाठवले जाते. हे सर्व एकत्र करून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठवले जाते. पण जूनचा अहवाल जि. प. प्रशासनाकडे मिळण्यास विलंब झाल्याने दूषित पाणी असलेल्या गावांत आवश्यक कार्यवाही करण्यास विलंब होणार आहे.

५) आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या !

पावसाळ्याचे दिवस आहेत. काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. यामुळे शक्यतो पावसाळा जाईपर्यंत पाणी उकळून प्यावे. जलजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी काळजी घ्यावी.

-डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी