शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीला धक्का! एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
4
यमुना एक्सप्रेस वेववरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
5
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
6
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
7
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
8
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
9
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
10
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
11
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
12
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट
14
कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
15
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
17
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
18
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
19
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
20
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले

ओंजळभर पाण्यासाठी पायाला भिंगरी

By admin | Published: May 03, 2016 12:05 AM

म्हासुर्ली खोरा तहानलेलाच : मातीचे बंधारे कोरडे; शेतकरी हवालदिल

महेश आठल्ये --म्हासुर्ली --मातीचे बंधारे घालून साठवून ठेवलेले पाणी संपल्याने तसेच जंगलातील झरे आटल्याने संपूर्ण धामणी खोऱ्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांना घागरभर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. परिणामी, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शेतातील पिके वाळून गेली आहेत. जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या खोऱ्यात उपसाबंदी लागू आहे. धामणीच्या पात्रात सध्या जे.सी.बी.द्वारे खड्डे मारून पाणी मिळविण्याची लगबग सुरू असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. धामणी खोऱ्यातील तीन तालुक्यांत विभागलेल्या सुमारे ५० ते ६० वाड्यावस्त्यांच्या पाचविलाच पाणीटंचाई पुजली आहे. दरवर्षी धामणीच्या पात्रात गरजेनुसार स्वखर्चाने व श्रमदानाने मातीचे बंधारे घालून पाणी अडवून ठेवले जाते व नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईवर केविलवाणी मात केली जाते. दरवर्षी मार्चपर्यंत पाणी कसेबसे पुरते. यावर्षी मात्र चार महिने मुबलक पाऊस पडणाऱ्या खोऱ्यावर निसर्गाने अवकृपा केल्याने अवघा आठ दिवस पाऊस पडला. परिणामी, यावर्षीची पाणीटंचाई भीषण आहे. नदीपात्र महिन्यापूर्वीच कोरडे पडले आहे. जंगलातील झऱ्यांचे पाणीही आटल्याने वन्यप्राण्यांसह नागरिकांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच पाण्यासह शेतातील पिके वाळून गेली असून, या टंचाईकाळात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेती व्यवसाय आतबट्ट्यात असून, दूध धंदाही पाणी आणि वैरणीमुळे बंद पडत आला आहे.म्हासुर्ली मुख्य गाव व वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. नदीच आटल्याने दोन-दोन जॅकवेल असतानाही येथे गेले १४ दिवस पाण्याचा पत्ता नाही. आस्वलवाडी, झाणवाडी, जोगमवाडी व धनगरवाड्यावर घागरभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे. पाण्याच्या वाटण्या कराव्या लागत आहेत. कोतोली, गवशी या गावांतीलही नदी आटल्याने अशीच अवस्था असून, गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे, खेरिवडे, शेळोशी, जर्गी, बावेली, कडवे, आदी गावांतील वाड्यावस्त्यांवर असणारे झरे आटले असून, सायफन योजना बंद पडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कूपनलिकाही आटल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पन्हाळा तालुक्यातील पणोरे, वेतवडे, गोगवे, कोदवडे परिसरातील कळे धरणातून बॅकवॉटरने पाणी आंबर्डेपर्यंत आणल्याने या परिसरात पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवत असल्या तरी मुबलक पाणी दुर्मीळच आहे. धामणीवासीयांच्या आशा पुन्हा पल्लवितपाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धामणी प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत आहे. या प्रकरणाच्या पूर्णत्वाशिवाय या खोऱ्यातील ५० ते ६० वाड्यावस्त्यांवर विकासाची गंगा पोहोचणार नाही. या खोऱ्यातील जनतेने प्रकल्प पूर्णत्वासाठी दोन महिन्यांपूर्वी विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून सरकारचे लक्ष वेधले होते. त्याचाच परिणाम म्हणून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी म्हासुर्ली येथे भेट देऊन या प्रश्नावर गांभीर्याने मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने धामणीवासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. म्हासुर्ली-झापावाडी (ता. राधानगरी) येथे जंगलातील झऱ्यावर पाण्यासाठी झालेली गर्दी.