शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“१०० टक्के परिवर्तन, आणखी अनेकांचा प्रवेश होणार”; समरजित घाटगे अधिकृतपणे शरद पवार गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 20:39 IST

Samarjit Singh Ghatge Joins NCP SP Group: मग तुमच्याकडे काय आहे? असे लोक विचारतात. माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद आहे, असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे.

Samarjit Singh Ghatge Joins NCP SP Group: मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करत आहे की, ही परिवर्तनाची मुहुर्तमेढ आहे. आताच कुणीही विजयाचा आनंद साजरा करु नका, पुढच्या दोन महिन्यांत आपल्याला खूप काम करायचे आहे. कागलमध्ये प्रत्येक घराघरात शरद पवारांचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे. प्रत्येक घरापर्यंत तुतारी पोहोचवायची आहे, त्यासाठी काम करा. कागलमध्ये १०० टक्के परिवर्तन होणार आहे. पक्षात आणखी अनेकांचा प्रवेश होणार आहे, असा दावा समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे. अखेर भाजपामध्ये असलेल्या समरजितसिंह घाटगे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश झाला. 

यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना समरजितसिंह घाटगे म्हणाले की, शरद पवार यांनीच सांगितले की, सभा गैबी चौकात घ्या. काही जणांना वाटत होत गैबी चौकातच आपलीच सभा होईल. पण हा वस्तादांचाच गैबी चौक आहे. स्वर्गीय मंडलिक आणि घाटगे यांनी राजकीय विरोध प्रामाणिकपणे केला. त्यांचा संघर्ष प्रामाणिक राहिला आहे. त्यांनी कागलचा पुरोगामी विचार पुढे नेला तेच मी करणार. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढचे राजकारण करणार. या कागलच्या भूमीत परिवर्तन करणारच, असा निर्धार समरजितसिंह घाटगे यांनी बोलून दाखवला.

माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद आहे

मीडियाचे लोक मला विचारतात की, समोर जे कागलमधील मंत्री महोदय आहेत, जे पाच वेळा आमदार झाले आहेत, त्यांच्या बाजूने सगळे गट आहेत, त्यांच्याकडे महायुती, केंद्र, मोठमोठ्या संस्थांची ताकद आहे. मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद आहे. मला आणखी काही नको, असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा. ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू. जबरदस्त संख्येने तुम्ही समरजित घाटगे यांच्यासाठी उपस्थित राहिलात. मी गैबी चौकात अनेकदा सभा घेतल्या, पण आजची गर्दी मी कधी पाहिली नाही. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेली साथ विसरून चालणार नाही. मागे एकदा पक्ष फुटला त्यावेळी सदाशिवराव आणि बाबासाहेब यांनी पाच वर्षात पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूरची भूमी स्वाभिमान गहाण ठेवत नाही हे या सहकाऱ्यांनी दाखवून दिले होते, असे शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Samarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार