शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘जनसुराज्य’च्या आडून ‘भाजप’ची बंडखोरी -: शिवसेनेला थोपविण्यासाठी खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:10 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. यामध्ये दहापैकी सहा जागा शिवसेनेला तर दोन भाजपला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला देण्यावरूनच भाजपमध्ये अस्वस्थता होती.

ठळक मुद्देते ‘जनसुराज्य’कडून लढले नसले तरी ‘अपक्ष’ म्हणून रिंगणात राहू शकतात.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : जिल्ह्यात शिवसेनेने दहापैकी आठ मतदारसंघांत पक्षाचे ‘ए बी’ फॉर्म देऊन उमेदवारी निश्चित केल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. महायुतीतील मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाच्या साथीने शिवसेनेवर प्रतिडाव खेळण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपमधील इच्छुकांच्या हातात ‘नारळ’ देऊन ‘जनसुराज्य’च्या मार्फत रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. यामध्ये दहापैकी सहा जागा शिवसेनेला तर दोन भाजपला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला देण्यावरूनच भाजपमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे शिवसेनेचे सहा विद्यमान आमदार सोडून उर्वरित चार जागांवर भाजपने दावा केला होता. युती तुटली तर आपली तयारी असावी, म्हणून दहाही मतदारसंघांत भाजपने उमेदवार तयार ठेवले आहेत. सात जागी भाजप तर तीन जागा जनसुराज्य पक्षाला देण्याचा ‘फॉर्म्युला’ही ठरला आहे. त्यातूनच ‘कागल’मधून ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दोन वर्षांपासून प्रचारच सुरू केला होता. ‘चंदगड’ ताब्यात घ्यायचाच, या इराद्याने माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील, गोपाळराव पाटील, अशोक चराटी यांना पक्षात घेतलेच, त्याचबरोबर आमदार संध्यादेवी कुपेकर यांचा प्रवेश ठरला होता. राधानगरीतून राहुल देसाई, शिरोळमधून अनिल यादव, राजवर्धन नाईक-निंबाळकर, ‘कोल्हापूर उत्तर’मधून महेश जाधव, सत्यजित कदम यांनी तयारी केली आहे.

पण जागावाटपात कोल्हापुरातील दोनच जागा भाजपच्या पदरात पडल्याने भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दोन जागा लढून जिल्ह्यातील सत्तास्थाने ताब्यात ठेवणे अडचणीचे ठरू शकते, त्यामुळे भाजपकडील इच्छुकांच्या हातात ‘जनसुराज्य’चा ‘नारळ’ हातात देण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत तसे सिग्नल रविवारी रात्री संबंधितांना वरिष्ठ पातळीवरून आल्याचे समजते.

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांच्या नावाची ‘हातकणंगले’ तर नगरसेवक सत्यजित कदम यांच्या नावाची ‘कोल्हापूर उत्तर’मधून ‘जनसुराज्य’तर्फे चर्चा सुरू आहे. राधानगरीतून राहुल देसाई गुरुवारी (दि. ३) अर्ज दाखल करणार आहेत. डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी लढणार नसल्याचे सांगितले, त्यानंतर आता तयारी केली आहे. तोपर्यंत राष्टÑवादीने ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे डॉ. बाभूळकर यांना ‘जनसुराज्य’ हा पर्याय राहू शकतो. शिरोळमधून राजवर्धन नाईक-निंबाळकर, अनिल यादव इच्छुक आहेत. ‘कागल’मधून समरजितसिंह घाटगे हे थांबणार नाहीत. ते ‘जनसुराज्य’कडून लढले नसले तरी ‘अपक्ष’ म्हणून रिंगणात राहू शकतात.

सेनेच्या अडचणी वाढणार!युती होऊनही ‘जनसुराज्य’च्या माध्यमातून भाजपने खेळलेल्या खेळीमुळे शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत. या बंडखोरीचा ‘राधानगरी’, ‘हातकणंगले’, ‘कोल्हापूर उत्तर’ या मतदारसंघांत मोठा फटका बसू शकतो.

‘जनसुराज्य’च्या संपर्कात असलेले इच्छुक मतदारसंघ

इच्छुक

  • हातकणंगले -अशोकराव माने
  • कोल्हापूर उत्तर- सत्यजित कदम
  • चंदगड -डॉ. नंदिनी बाभूळकर

अपक्ष’ म्हणून रिंगणात मतदारसंघ इच्छुक

  • राधानगरी राहुल देसाई
  • कागल समरजितसिंह घाटगे
  • शिरोळ राजवर्धन नाईक- निंबाळकर
टॅग्स :Vidhan Parishad Election 2018विधान परिषद निवडणूक 2018kolhapurकोल्हापूर