कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण लावणाऱ्या भाजपचा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करुन निषेध नोंदवला. भाजपने आपले अपयश लपवण्यासाठी शेतकऱ्यांची बदनामी सुरु केली आहे, असा आराेप करत निषेधाच्या घोषणाही दिल्या.
गुरुवारी संध्याकाळी झालेल्या या आंदोलनात किसान संघर्ष समन्वय समितीचे नामदेव गावडे, बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, टी. एस. पाटील, वसंतराव पाटील, दिलदार मुजावर, रवी जाधव, शौकत कलोट, राजाराम धनवडे, उज्ज्वला कदम, शीतल पोवाळकर, रेखा पोवाळकर, गीता जाधव, प्रिया जाधव, प्रियांका पाटील, सुभाष सावंत, यशवंत पाटील यांनी सहभाग घेतला.
फोटो: २८०१२०२१-कोल-किसान सभा
फाेटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी संध्याकाळी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने शिवाजी चौकात भाजपविरोधात निदर्शने केली.
(छाया : नसीर अत्तार )