शहरातील कडगाव रोडवरील महावितरण कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकून भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कृतीचा निषेध नोंदविला. याप्रश्नी महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठवून राज्यातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप महावितरणने केले आहे. त्यांचे वीजबिल तत्काळ माफ करावे. जोपर्यंत वीजबिल माफ होत नाही, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
आंदोलनात शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, मारुती राक्षे, प्रीतम कापसे, विठ्ठल भमानगोळ, युवराज बरगे, अनिल खोत, संदीप नाथबुवा, अर्चना रिंगणे आदींनी सहभाग घेतला.
---------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे महावितरण उपअभियंत्यांना राजेंद्र तारळे यांनी निवेदन दिले. यावेळी मारुती राक्षे, अनिल खोत, प्रीतम कापसे, विठ्ठल पाटील, विठ्ठल भमानगोळ आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०५०२२०२१-गड-०४