शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

संवर्धनातील पदार्थांमुळे अंबाबाई मूर्तीवर डाग

By admin | Published: May 31, 2017 2:46 PM

आर्द्रता समितीचा प्राथमिक अंदाज : मूर्तीची पाहणी

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३१ : अंबाबाई मूर्ती संवर्धनाच्या प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या पदार्थांमुळे मूर्तीवर पांढरे डाग पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आर्द्रता समितीने बुधवारी व्यक्त केला. मूर्तीवरील चकाकीचा थर कमी झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी प्श्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख पी.डी. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आर्द्रता समिती नियुक्त केली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता राऊत यांच्यासह उदय गायकवाड, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद कारंजकर, माधव मुनिश्वर, केदार मुनिश्वर यांनी अंबाबाई मूर्तीची पाहणी केली.

या पाहणी दरम्यान मूर्तीवर पांढऱ्या डागाचा थर नव्याने पडत आहे की तो संवर्धनाचाच एक भाग आहे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. मूर्ती ओली केली जाते तेंव्हा हे डाग दिसत नाही मात्र मूर्ती कोरडी होईल तसे डाग दिसू लागतात. त्यामुळे हे डाग म्हणजे संवर्धनातील पदार्थांचाच एक भाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती उदय गायकवाड यांनी दिली.

प्रक्रियेची सीडी उघड करा : आर्द्रता समितीची मागणी

तत्कालिन अधिकारी मनेजर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या संवर्धन प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग करण्यात आले आहे. ही सिडी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली त्यांनी ती सचिवांच्या ताब्यात दिली. या संवर्धनातील घटकांचा मूर्तीवर परिणाम होत असल्याने ती सिडी आर्द्रता समितीसमोर तरी उघड करा, सीडीचा गैरवापर होवू नये यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या उपस्थिीतीत ती दाखवण्यात यावी अशी मागणी या समितीतील सदस्यांनी केली आहे.

पूरातत्वकडून शुक्रवारी पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी औरंगाबाद येथील पूरातत्वच्या अधिकाऱ्यांश्ी संपर्क साधून अंबाबाईची मूर्ती पाहणीसाठी कोल्हापूरात येण्याची विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२ जून) पूरातत्व खात्याचे अधिकारी अंबाबाई मूर्तीची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच नक्की चुकलंय कुठे हे स्पष्ट होईल.

अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन का?

पूरातत्वच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाईच्या केवळ अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन केलेल्याचे आर्द्रता समितीच्या निदर्शनास आले आहे. देवीचा चेहरा, उजवी व डावी बाजू मुकूट येथे पांढरे डाग नाही. कारण या भागावर संवर्धनाचे काम करण्यात आलेले नाही. देवीची गदा, पाय, सिंह आणि त्यावरील बाजू, ढाल या संवर्धन केलेल्या ठिकाणी हे डाग पडले आहेत. आणि चकाकीचा थर कमी झाला आहे. अशा पद्धतीने काम का करण्यात आले हा प्रश्न आहे.

पूरातत्वच्या अधिकाऱ्यांनी मूर्ती संवर्धनात कोणते साहित्य किती प्रमाणात वापरले, संवर्धन नेमके कसे केले याची आम्हाला काहीच माहिती नाही. पूरातत्वचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुनच याबाबतचे भाष्य करता येईल.

पी.डी. राऊत,

अध्यक्ष, आर्द्रता समिती