शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

पूरबाधित ऊस १५ जानेवारीपर्यंत तोडा : एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:36 AM

पूरबाधित उसाचे नुकसान लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्राधान्याने या उसाची उचल करण्याचे आदेश देऊनही त्याकडे साखर कारखान्यांनी पाठ फिरविली आहे. अद्याप २३ हजार हेक्टरवरील ऊस शिवारातच पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘पंचगंगा’, ‘जवाहर’, ‘घोरपडे’ कारखाने असा ऊस उचलण्यात सगळ्यात मागे राहिले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी देसाई यांचे आदेश : कृषी पंपांच्या वीज जोडणीचा आढावा

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ७०:३० या फॉर्म्युल्यानुसार पूरबाधित क्षेत्रातील उसाची तोडणी १५ जानेवारीपर्यंत संपवावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात पूरबाधित क्षेत्रातील शेतीपंपांच्या वीज जोडणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रा. एन. डी. पाटील, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, माजी आमदार उल्हास पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील-किणीकर, मारुती पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता सागर मारुलकर, तहसीलदार अर्चना कापसे, साखर उपसंचालक एन. एस. जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या कृषी पंपांचे पंचनामे करण्याबाबत सूचना केल्या होत्या. तसेच महापुरामुळे रोहित्रे, विद्युत खांब, वायर मीटर्स यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सर्व कृषी पंपांचे कनेक्शन वेळेत सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा बैठक घेऊन कृषी पंपांचे वीज कनेक्शन ताबडतोब जोडणीसाठी निर्देश दिल्याने बहुतांश कृषी पंपांची वीज कनेक्शन जोडली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अद्याप काही कृषी पंपांचे वीज कनेक्शन जोडणी असल्यास ती तत्काळ जोडावीत, तसेच महापुराने बाधित कृषी पंपांचे केलेले पंचनामे याची सविस्तर माहिती तीन दिवसांत द्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाºयांना दिले. त्याचबरोबर सर्व साखर कारखान्यांनी पूरबाधित क्षेत्रातील ऊस तोडणी १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी साखर उपसंचालक एन. एस. जाधव व सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना दिले. यावेळी सुभाष शहापुरे, आर. के. पाटील, संजय चौगुले, सखाराम चव्हाण, महादेव सुतार, आदी उपस्थित होते.

 

तालुकावार वैयक्तिक कृषी पंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्था यांची संख्या व झालेल्या नुकसानीची रकमेसह माहिती द्यावी.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

पूरबाधित उसाकडे कारखानदारांची पाठकोल्हापूर : पूरबाधित उसाचे नुकसान लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्राधान्याने या उसाची उचल करण्याचे आदेश देऊनही त्याकडे साखर कारखान्यांनी पाठ फिरविली आहे. गेल्या महिनाभरात केवळ ४३०७ हेक्टरवरील उसाची उचल कारखान्यांनी केली आहे. अद्याप २३ हजार हेक्टरवरील ऊस शिवारातच पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘पंचगंगा’, ‘जवाहर’, ‘घोरपडे’ कारखाने असा ऊस उचलण्यात सगळ्यात मागे राहिले आहेत.

जुलै-आॅगस्ट महिन्यांत आलेल्या महापुरात ऊस पिकांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यात एक लाख ९७ हजार ९४६ हेक्टरवर उसाचे क्षेत्र असून, त्यातील २७ हजार ६६१ हेक्टर पूरबाधित क्षेत्र आहे. पूरबाधित उसाची लवकर तोड न झाल्यास शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही; त्यामुळे या उसाची प्राधान्याने उचल करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी साखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन तीन आठवड्यांत टप्प्याटप्प्याने उसाची उचल करण्याचे आदेश दिले होते.

कारखान्यांनीही प्राधान्याने या उसाची उचल करण्याची ग्वाही दिली होती. हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी केवळ ४३०७ हेक्टरवरील पूरबाधित उसाची उचल केली आहे. अद्याप २३ हजार ४२९ हेक्टरवरील ऊस शिवारात उभा आहे; त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी देसाई यांनी सोमवारी आढावा बैठक घेऊन कारखानदारांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत. सर्वाधिक पूरबाधित क्षेत्र दत्त-शिरोळ कारखान्याचे २५०० हेक्टर आहे, त्यांनी आतापर्यंत ५६० हेक्टरवरील उसाची उचल केली आहे. ‘जवाहर’, ‘पंचगंगा’, ‘घोरपडे’ कारखाने पूरबाधित ऊस उचलीत फारच मागे आहेत. यंदा हंगाम जेमतेम तीन महिने चालेल, अशी परिस्थिती आहे. एकंदरीत साखर कारखानदारांची मानसिकता पाहता हंगाम संपेपर्यंत टप्प्याटप्प्याने पूरबाधित उसाची उचल करण्याचे नियोजन दिसत आहे.

उतारा घटण्याची धास्तीपूरबाधित ऊस एकदम तोडल्यास साखर उताऱ्यावर परिणाम होणार आहे. सध्या सर्वच कारखान्यांचा उतारा तुलनेत कमी आहे. या धास्तीमुळेच पूरबाधित उसाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSugar factoryसाखर कारखाने