शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

‘बिद्री’च्या उमेदवारीसाठी नेत्यांचीच भाऊगर्दी

By admin | Published: October 26, 2016 10:33 PM

कार्यकर्त्यांचा होणार हिरमोड : जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघांच्या आरक्षणाचा परिणाम

निवास पाटील --सोळांकूर --बिद्री साखर कारखाना कार्यक्षेत्रात असणाऱ्या राधानगरी, भुदरगड, करवीर, कागल तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांचे आरक्षण मनासारखे न पडल्याने दोन्ही आघाड्यांकडून इच्छुकांची गर्दी होणार, हे निश्चित. त्यामुळे कार्यकर्ते जरी जोमात असले तरी नेतेच ‘बिद्री’च्या प्रेमात पडण्याची शक्यता अधिक आहे. अनेक वर्षे सत्तेच्या आशेपोटी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना नेते बळ देणार की, कार्यकर्ते नेत्यांना पाठबळ देणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.बिद्री साखर कारखान्याच्या वाढीव सभासद संस्था न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच साखर कारखान्याची निवडणूक एकाच महिन्यात होण्याची शक्यता आहे. बिद्री साखर कारखाना चारही तालुक्यांतील मोठी संस्था आहे. आपली वर्णी संचालक पदावर लागावी म्हणून अनेकजण देव पाण्यात घालून बसले आहेत. सत्ताधारी व विरोधी दोन्हीही आघाड्यांतील प्रमुख नेत्यांनी इच्छुकांची गर्दी कमी करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे आमिष दाखविण्यात आले होते. आरक्षणापूर्वी अनेकांनी छुपा प्रचार सुरू केला होता; पण मनासारखे आरक्षण न पडल्याने मतदारसंघातील इच्छुक गायब झाले आहेत.कार्यक्षेत्रातील तालुक्याचे राजकारण पैशापेक्षा गटा-तटावर अवलंबून आहे. एकीकडे काही गटातील प्रमुख नेत्यांकडे कोणतेही महत्त्वाचे पद नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना हवे असणारे जि. प. व पं. स. मतदारसंघाचे आरक्षण पडले नसल्याने त्यांनाही कारखान्याच्या संचालकपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. आपली वर्णी लागावी म्हणून कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, गटाच्या प्रमुख नेत्यांकडेच महत्त्वाचे पद नसल्याने नेत्यांकडे बळ मागायचे की नेत्यांना पाठबळ देऊन सत्तेत आणायच,े अशी विचारधारा पुढे येत आहे.बिद्रीचे पॅनेल हे अवघ्या काही वेळात ठरते. नेमकी नेत्यांना की कार्यकर्त्यांना संधी मिळणार, हे निवडणुकीवेळीच ठरणार हे मात्र निश्चित.बिद्री कारखान्यात सत्ताधारी असणाऱ्या व विरोधी गटातही प्रमुख असणारे नेते यांना कोणतेच सत्तेचे पद नसल्याने, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण मनासारखे न पडल्याने बिद्री कारखान्यातील संचालक पदाशिवाय पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक गटांच्या नेत्यांकडे कोणतेही महत्त्वाचे पद नसल्याने चारही तालुक्यांतील गटांच्या नेत्यांची चांगलीच गोची होणार आहे. बिद्री कारखान्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.विरोधकांनी कडकडून विरोध केला असताना महत्त्वाकांक्षी सहवीज प्रकल्प व कारखाना कर्जमुक्तीकडे आहे. उच्चांकी ऊसदर, साखर उतारा, वाढीव सभासद, लोकाभिमुख कारभारामुळे या कारखान्याची सत्ता पुन्हा आपल्याकडे देतील, असा दावा सत्ताधारी मंडळी करीत आहेत. तर भ्रष्ट कारभार, बोगस सभासद, कारखान्यातील मनमानी कारभार यामुळे कारखान्याची सत्ता आपल्याकडे देतील, असा विश्वास विरोधी मंडळी व्यक्त करीत आहेत. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.