शहरं
Join us  
Trending Stories
1
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
2
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
3
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
4
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
5
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
6
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
7
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
8
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
9
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
10
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
11
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
12
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
13
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
14
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
15
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
16
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
17
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
18
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
19
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?

बजेट प्रतिक्रिया (कृषी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:14 AM

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सगळे प्रयोग शेतीवरच केले जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाच-सहा ...

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सगळे प्रयोग शेतीवरच केले जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाच-सहा वर्षे केवळ शेतीमालाला दीडपट भावाचे गाजर केंद्र सरकारने दाखवलेले आहे. प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. उलट शेतीमाल कवडीमोल दराने विक्री करावा लागत आहे. एकीकडे बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडण्याची भाषा केली जाते. मात्र स्थानिक बाजार समित्यांमध्ये त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा कोठे आहेत? केंद्र सरकारचे बजेट म्हणजे केवळ फसवणूक असून शेतीमालाला दीडपट राहू दे, आधारभूत तरी किंमत द्या, एवढीच अपेक्षा आहे.

- बाबासाहेब देवकर (शेतकरी, गाडेगोंडवाडी)

पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. केंद्र सरकार या बजेटमध्ये याबाबत काही तरी भाष्य करेल, अशी अपेक्षा होती. त्याचबरोबर जीएसटीसह इतर करांबाबत दिलासा मिळेल, असे वाटत होते, मात्र केंद्राच्या बजेटमधून अपेक्षाभंग झाला आहे.

- सूरज आडनाईक (व्यापारी, यवलूज)

केंद्राचे बजेट म्हणजे निव्वळ दिशाभूल आहे. यातून सामान्य माणसाला काहीच दिलासा नाही. कोरोनामुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले, त्यासाठी अपेक्षित असे काहीच यात दिसत नाही.

- प्रकाश पाटील (आमजाई व्हरवडे)