शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दिव्यांगांसाठी बजेटमध्ये तरतूद; खर्चात हात आखडता : कोल्हापूर महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:09 IST

कोल्हापूर महापालिकेमध्ये वर्षाला साडेतीन कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली जाते. प्रत्यक्षात हा सर्व निधी खर्च होत नाही. वर्षभरात केवळ १0 लाखांचा निधी वितरीत झाला आहे.

ठळक मुद्दे विशेष दिव्यांग सहाय्य निधीची स्थिती

विनोद सावंत ।कोल्हापूर : दिव्यांगांसाठी महापालिकेच्या बजेटमध्ये तरतूद केली जाते. प्रत्यक्षात सर्व निधीचे वाटप होत नाही. दरवर्षीचा निधी शिल्लक राहत असून, अनेक दिव्यांग बांधव योजनेपासून वंचित राहत असल्याचा आरोप दिव्यांग संघटनेकडून होत आहे, तर वर्षाला प्रतीक्षा यादीनुसार प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यास सुरू केले असल्याचा दावा महापालिकेचा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेंना बजेटच्या पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे आदेश आहेत, असे असताना याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. कोल्हापूर महापालिकेमध्ये वर्षाला साडेतीन कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली जाते. प्रत्यक्षात हा सर्व निधी खर्च होत नाही. वर्षभरात केवळ १0 लाखांचा निधी वितरीत झाला आहे. केएमटीकडे दरवर्षी ५0 लाख रुपये दिव्यांगांना मोफत प्रवास देण्यासाठी दिले जाते. प्रत्यक्षात दिव्यांग केएमटीचा वापर करत नाहीत, असा दावा दिव्यांग संघटनेचा आहे.बैठकीत निर्णय, कार्यवाही शून्यमहापालिकेमध्ये दिव्यांगांच्या समस्यासाठी बैठक घेतली जाते. निधी देण्याचे मान्य केले जाते. वर्षाला साडेतीन कोटींच्या निधीची तरतूद केली जाते. प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही. शहरात दिव्यांगांची संख्या ११00 आहे. जिल्हा परिषदेमध्येही हीच स्थिती आहे. १0 कोटींच्या निधीमधून दिव्यांगांसाठी कृत्रिम साहित्य खरेदी केले आहे. उद्घाटनाच्या घोळामुळे हे साहित्य गंजून खराब होत आहे.वापराविना केबिन धुळखातदिव्यांग बांधवांना रोजगार करता यावा; यासाठी महापालिकेने १७६ केबिनचे वाटप केले. यापैकी निम्म्या केबिन धुळखात पडून आहेत. व्यवसाय होणार नाही, अशा ठिकाणी केबिन दिल्या असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. 

महापालिकेकडून १७६ दिव्यांगांना केबिनचे वाटप केले. यापैकी काहींनी कब्जा घेतलेला नाही. संबंधितांना अंतिम नोटीस बजावू. यानंतर इतर पात्र दिव्यांगांना उर्वरित केबिन दिल्या जातील. महापालिकेतर्फे प्रत्येकी दिव्यांगांना वर्षाला २५ हजार रुपये देण्यात येत आहे..- प्रमोद बराले, इस्टेट अधिकारी,

पिंपरी-चिंचवड आणि नाशिक महापालिकेच्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेने साहित्य अथवा केबिनचे वाटप करण्यापेक्षा सर्वच दिव्यांगांना महिना २५00 रु. बेरोजगार भत्ता सुरू करण्यात यावा. यामुळे खचलेल्या सर्वच दिव्यांगांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.- देवदत्त माने, जिल्हाध्यक्ष, प्रहार अपंग कृती संघटना. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका