शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

जुन्या पिढीचा ‘उद्योग वारसा’ नवतंत्रज्ञानाच्या साथीने पुढे घेऊन जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:15 AM

कोल्हापूर : जुन्या पिढीतील उद्योजकांनी जमिनीसाठी करवीर संस्थानाकडे नजराणा भरून कोल्हापूरच्या उद्योगनगरीचा पाया रचला. विविध आव्हानांवर मात करीत त्यांनी ...

कोल्हापूर : जुन्या पिढीतील उद्योजकांनी जमिनीसाठी करवीर संस्थानाकडे नजराणा भरून कोल्हापूरच्या उद्योगनगरीचा पाया रचला. विविध आव्हानांवर मात करीत त्यांनी उद्योग वाढविला. त्यांनी दिलेला उद्योगाचा वारसा सध्याच्या आणि नव्यापिढीने नवतंत्रज्ञानाच्या साथीने पुढे घेवून जावा. उद्योगाचा विकास करावा, असे आवाहन ज्येष्ठ उद्योजक बाबाभाई वसा यांनी रविवारी येथे केले.

येथील शिवाजी उद्यमनगरमधील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन (केईए) बुधवारी (दि.७) अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करत असून त्याच्या बोधचिन्हाच्या (लोगो) अनावरणप्रसंगी ते बोलत होते. असोसिएशनच्या सभागृहातील या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. मी भाग्यवान आहे, कारण या ‘केईए’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मी अध्यक्ष होतो आणि आता अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण माझ्या हस्ते झाले आहे. उद्योग उभारणीचा सुरुवातीचा काळ आव्हानात्मक, समस्यांचा होता. मात्र, जिद्दी, कष्टाळू उद्योजकांनी त्यावर मात करत उद्योग सुरू केले. त्यात उद्योजक एस. ए. पाटील, वाय. पी. पोवार, राम मेनन आदींचे योगदान मोलाचे आहे. संस्थान विलीनीकरणात उद्योगांना जागा मिळावी यासाठी उद्योजक एस. ए. पाटील यांनी तर स्वत:कडील दागिने गहाण ठेवून संस्थानाकडे पैसे भरले. त्यानंतर कोल्हापूरच्या उद्योगनगरीची सुरुवात झाली. पुढे कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन या आपल्या मातृसंस्थेची स्थापना झाली. अनेक आव्हानांचा सामना करत या संस्थेसह उद्योग वाढत राहिला. संस्थेच्या इतिहास लक्षात घेऊन संचालकांनी कार्यरत राहावे. नवउद्योजक, उद्योगांना ताकद द्यावी, असे आवाहन बाबाभाई वसा यांनी केले. उद्योग विकासाचे ध्येय घेवून एका विचाराने कार्यरत असणाऱ्या संचालकांमुळे आपली मातृसंस्था केईए ही अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करत आहे. जुन्या पिढीतील उद्योजकांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवल्याने कोल्हापूरचा उद्योग वाढला असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमास असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षद दलाल, सहसचिव प्रसन्न तेरदाळकर, उद्योजक कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, रणजित शाह, संजय अंगडी, नितीन वाडीकर, बाबासोा कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदीप मांगोरे, अभिषेक सावेकर, सोहन शिरगांवकर, प्रकाश चरणे, श्रीकांत देसाई, प्रदीप व्हरांबळे, मिलिंद सार्दळ उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी प्रास्ताविक केले. सचिव दिनेश बुधले यांनी आभार मानले.

चौकट

तर पहिला ट्रॅक्टर ट्रेलर कोल्हापुरातील असता

सन १९७५-७६ मध्ये कोल्हापुरातील उद्योजक हे म्यानमार येथील कंपनीशी करार करून तेथील तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी जपानलाही गेले. या उद्योजकांना आणखी साथ मिळाली असती तर पहिला टॅक्टर ट्रेलर हा कोल्हापूरमध्ये तयार झाला असता. परंतु ते शक्य झाले नाही, अशी खंत बाबाभाई वसा यांनी व्यक्त केली.