शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

गांधीनगरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज

By admin | Published: March 03, 2016 12:28 AM

गुन्हेगारी प्रमाणात वाढ : चोऱ्या, किरकोळ गुन्ह्यांवर पाळत ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक

बाबासाहेब नेर्ले --गांधीनगर -व्यापाऱ्याचे अपहरण, चोरी, भुरट्या चोरी, मटका आणि अवैध धंद्यांमुळे गांधीनगर बाजारपेठेत वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. गुन्हेगारीविषयक घटनांना आळा घालण्यासाठी गांधीनगर बाजारपेठेत सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची गरज निर्माण झाली आहे. व्यापारी पेठेत किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागल्याने कापड नगरीतील गुन्हेगारांवर पाळत ठेवण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी सीसीटीव्ही चांगला पर्याय ठरणार असून, लोकसहभागातून हा उपक्रम राबवण्यासाठी व्यापारी व अन्य व्यावसायिकांनी पुढे येणे अपेक्षित आहे.पश्चिम महाराष्ट्रातील मोठी कापड बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. उचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, वळिवडे व चिंचवाड या पाच गावच्या हद्दीत ही व्यापारीपेठ विस्तारली आहे. या व्यापारी केंद्रात कापड व्यवसायाबरोबरच प्लास्टिक, कटलरी, होजिअरी अनेक छोटेमोठे उद्योग विस्तारत आहेत. जिद्दीने, कष्टाने येथील व्यापारी व्यवसाय करीत आहेत; पण ‘आयत्या बिळात नागोबा’ या म्हणीप्रमाणेच काहीजण व्यापाऱ्यांना त्रास देतात. चोऱ्या, अपहरण, चेनस्नॅचिंग या घटनांना येथील व्यापाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. अपहरण, चोऱ्यासारख्या घटना घडूनही काही व्यापारी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे पोलिसांनाही अशा गुन्ह्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी अशा गुन्हेगारांचे फावते आहे.दोन वर्षांत तीन अपहरणाच्या घटना घडल्या. त्यामध्ये मोठ्या व्यावसायिकांनाच टार्गेट करण्यात आले. त्यामुळे गांधीनगर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटना ताजी होती तेव्हा अनेक व्यापारी व व्यावसायिकांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घेतला; पण त्याला म्हणावी तितकी गती मिळाली नाही. होलसेल संघ, रिटेल व्यापारी संघ तसेच अन्य संघटना यांच्या मदतीने व सीसीटीव्हीच्या आधारे असे वाढते गुन्हे रोखता येतील; पण त्याची गंभीरता लक्षात येणे गरजेचे आहे.एक महिन्यापूर्वी गांधीनगरातील एका व्यापाऱ्याचे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना अपहरण झाले. त्यामुळे गांधीनगर व्यापारीपेठेत भीतीचे वातावरण पसरले. अनेक व्यापारी हे मॉर्निंग वॉकला जाण्याचे टाळू लागले. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना कमी करावयाच्या असल्यास अशा घटनांवर चाप आणला पाहिजे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे. सीसीटीव्ही बसविल्याने अनेक गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होईल. गर्दीच्या ठिकाणी होणारी पाकीटमारी, किरकोळ वाद, महिलांची होणारी टिंगलटवाळी, चोरीच्या घटना, या सर्व बाबींवर अंकुश ठेवणे सहज शक्य होईल. तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे गेट हा मुख्य रस्ता तसेच शेरू चौक, सिंधू मार्केट, रेल्वे स्थानक, भाजी मंडई, गुरुनानक पेट्रोल पंप, अशा वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची गरज आहे.यासाठी येथील व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन या सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यापारी पेठेवर सीसीटीव्हीचा वॉच राहिला तर अशा दुर्घटनांपासून गांधीनगर बाजारपेठ सुरक्षित राहील. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात मदत होईल. +परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पोलीस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेतच; पण ती कशी टाळता येईल या बाबींकडे लक्ष केंद्रित करून उपाय योजना करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. - संभाजी गायकवाडसहायक पोलीस निरीक्षकगांधीनगर पोलीस ठाणे.वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी गांधीनगरमध्ये सीसीटीव्हीची गरज आहेच. त्या बाबतीत सर्व होलसेल व रिटेल व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला तर गांधीनगर खरोखरच भयमुक्त होईल. - सुरेश आहुजाव्यापारी गांधीनगरवाहतुकीच्या दृष्टीने गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांमध्ये गुन्हेगारींची दहशत आहे. त्यामुळे बिनधास्त फिरणे अवघड झाले आहे.- रमेश वाच्छाणीव्यापारी, गांधीनगर.