शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
4
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
5
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
6
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
7
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
8
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
9
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
10
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
11
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
12
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
13
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
14
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
15
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
16
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
17
कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाली- "मी १०० टक्के दिले, पण..."
18
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
19
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
20
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता

पत्रकारांच्या दिशेवरच केंद्राची सत्ता ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:19 AM

कोल्हापूर : आम्ही तीन राज्यांत हरलो म्हणून काय झाले, आमची मते जास्त आहेत, घाबरू नको, असे अंबाबाईच मला दृष्टांत ...

कोल्हापूर : आम्ही तीन राज्यांत हरलो म्हणून काय झाले, आमची मते जास्त आहेत, घाबरू नको, असे अंबाबाईच मला दृष्टांत देऊन सांगते. आम्ही काम करतोय; पण सद्य:स्थितीत पत्रकार कोणत्या दिशेने वातावरण नेतात, त्यावरच केंद्रात आमची सत्ता पुन्हा येणार, की नाही ते ठरणार आहे, अशी कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यातही सरकार असेल, मी मंत्री असेन याचीही आता शाश्वती राहिली नाही, तरीही पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध असेन, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली.पत्रकार दिनाचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार भारतकुमार राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अर्जुन टाकळकर, संदीप राजगोळकर, विजय केसरकर, अभिजित पाटील यांचा पुरस्काराने गौरव झाला. संपर्क अ‍ॅडव्हायजर्सचे सुधीर शिरोडकर व मोहन कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक विजय जाधव, प्रा. शिवाजी जाधव, विजय टिपुगडे, मिलिंद यादव यांचा विशेष सन्मान झाला.भारतकुमार राऊत म्हणाले, पत्रकारितेला फुटीरतेचा शापच आहे. तालुक्यापासून देशपातळीवर वेगवेगळ्या संघटनांमध्ये पत्रकार विभागला गेल्याने त्यांची ताकदही क्षीण झाली आहे. शक्तीच विभागली गेल्याने त्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी जटील बनत चालल्याची खंत वाटते.प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष समीर मुजावर, सचिव बाळासाहेब पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.पत्रकारांना कल्पनेपलीकडचे घर मिळेलपत्रकारांच्या घरासाठी आपण कायमच आग्रही असून, कल्पनेच्या पलीकडचे घर त्यांना लवकरच मिळेल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. साडेआठ लाखांतील घरासाठी केंद्र व राज्य सरकारकडून पाच लाखांचे अनुदान मिळवून देत, अवघ्या चार लाखांतील घर पत्रकारांसाठी उपलब्ध करून देणारी योजना तयार करण्यात आली आहे. ‘म्हाडा’च्या निम्म्या किमतीत अशी २00 घरे बांधणार असून, त्यापैकी ५0 घरे ही सैनिकासह नामवंत पत्रकारांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.