शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

कोल्हापूरसाठी काय केले, बिंदू चौकात सामना होऊ दे; चंद्रकांत पाटलांचे सतेज पाटलांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:37 AM

कोल्हापूर : शहरातील नागरिकांना त्यांच्या चारचाकी गाडीच्या किमतीएवढा टोल ३० वर्षे भरावा लागला असता त्याची तुम्ही पावती फाडली, परंतु ...

कोल्हापूर : शहरातील नागरिकांना त्यांच्या चारचाकी गाडीच्या किमतीएवढा टोल ३० वर्षे भरावा लागला असता त्याची तुम्ही पावती फाडली, परंतु भाजपने ४७३ कोटी रुपये भरून टोल घालवला. त्यामुळे तुम्ही कोल्हापूरसाठी काय केले आणि आम्ही काय केले याचा जाहीर सामना बिंदू चौकात होऊन जाऊ देे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले.

‘कोल्हापूर उत्तर’चे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करत कदम यांनी अर्ज दाखल केला.

पाटील म्हणाले, २०१९ ला महापूर आला असताना तातडीने सर्व घटकांसाठी मदत देण्याचा आदेश काढला. वेळ जायला नको म्हणून रोख रक्कम दिली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तर महाविकास आघाडीत असूनही राजू शेट्टी यांच्यावर आंदोलनाची वेळ आली. विमानतळासाठी केंद्र सरकारने २७३ कोटी देण्याआधी राज्य शासनाचे ८० कोटी रुपये आम्ही दिले. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी आम्ही निधी दिला. परंतु तुम्हाला तो राबवता आला नाही. थेट पाईपलाईनचे पाणी आले नाही तर निवडणूक लढवीत नाही म्हणाला हाेता. परंतू अजून पाण्याचा पत्ता नाही.

धनंजय महाडिक म्हणाले, यांना केवळ सर्व सत्ताकेंद्रे ताब्यात हवीत. विकास कामांची चर्चा नको आहे. शिवसेनेची अवस्था तर ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. कोल्हापूरचा भगवा आता आमचा पेटंट आहे. काही जणांना पोलिसांकडून त्रास देणे सुरू आहे. परंतु मोदींनी राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून भाजपचा झेंडा फडकवा.

सुरेश हाळवणकर म्हणाले, कोणाची मस्ती कशी उतरवायची, हे कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे. बंटी पाटील यांच्या अहंकाराविरोधात, हुकूमशाहीविरोधातील ही निवडणूक आहे. यावेळी सत्यजित कदम, जयंत पाटील, शहाजी कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, विजय सूर्यवंशी, राहुल आवाडे, पृथ्वीराज महाडिक, उत्तम कांबळे, सुनील कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मराठा समाजावर अन्याय

समरजित घाटगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ज्या सुविधा दिल्या त्या देणेही सध्या महाविकास आघाडीला जमलेले नसल्याने, राज्यातील मोठ्या समाजावर अन्याय करण्याचे काम सुरू आहे. मंत्र्यांच्या गाड्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी निधी आहे. मात्र आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जप्रकरणांचे व्याज देण्यासाठी निधी नाही. माझे वडील विक्रमसिंह घाटगे हे २०१४ मध्ये सत्यजित कदम यांच्या प्रचारात होते. त्यांचे अर्धे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

...तर अडवून चिंध्या करू

प्रकाश आवाडे म्हणाले, काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द केल्यानंतर मी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले म्हणून माझ्याकडे विचारणा झाली, तेव्हा मी पक्षच सोडला. कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. हा जिल्हा कुणाची बटिक नाही. संपत्तीच्या आणि सत्तेच्या जोरावर जर कोणी मागून फरफटत न्यायचा प्रयत्न केला तर अडवून चिंध्या केल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील