शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:26 IST

chandrakant patil, Bjp, Kolhapurnews, MaheshJadhav पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख यांच्या विजयासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी अथक परिश्रम घेतले तरीही महाविकास आघाडीच्या युतीमुळे हा पराभव झाला. त्यास व्यक्तिगत कोणीही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते जबाबदार नाहीत. त्यामुळे राजीनाम्याची मागणी चुकीची असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी स्पष्ट केले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीचीपदाधिकाऱ्यांचे म्हणणे : पराभवास व्यक्तिगत कोणी जबाबदार नाही

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख यांच्या विजयासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी अथक परिश्रम घेतले तरीही महाविकास आघाडीच्या युतीमुळे हा पराभव झाला. त्यास व्यक्तिगत कोणीही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते जबाबदार नाहीत. त्यामुळे राजीनाम्याची मागणी चुकीची असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी स्पष्ट केले.किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राहुल देसाई, पृथ्वीराज यादव, सुनील मगदूम, दत्तात्रय मेडशिंगे, हंबीरराव पाटील, प्रवीण प्रभावळकर, संभाजी आरडे, दीपक शिरगावकर, आनंदराव साने, नामदेव पाटील यांनी हे स्पष्टीकरण केले.पक्षाच्या संस्कृतीप्रमाणे, लोकशाही पद्धतीप्रमाणे हा पराभव आम्ही खिलाडूवृत्तीने मान्य केला आहे. तरीही पेठवडगाव येथील पत्रकार परिषदेत काही माजी पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली व त्यांच्यावर साफ चुकीचे आरोप केले आहेत.

जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील म्हणाले, घाटगे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पक्षबांधणी केली. शिवार संवाद, कोविड सेंटरना भेटीतून पक्ष लोकांपर्यंत नेला.

जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे काम चांगले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर १२ दिवसांनी अशा पद्धतीचे आरोप करणाऱ्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व खोडसाळपणाचे आहेत.आरोप करणारे तर फुटकळ : महेश जाधव

ज्यांना पक्षात फार महत्त्व नाही अशा दोन-चार फुटकळांनी आरोप केल्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व कमी होणार नाही, असे पत्रक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

विधान परिषद निवडणुकीतील पराभवाचे निमित्त करून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. मात्र, पाच वर्षांत पंचायत समितीपासून, जिल्हा परिषदेसह अनेक ठिकाणी भाजपचा झेंडा फडकला यामध्ये आमदार पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याची दखल आरोप करणाऱ्यांनी घ्यावी.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूरMahesh Jadhavमहेश जाधव