शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणातून चेतन नरके यांची माघार, कोणाला पाठिंबा देणार.?

By राजाराम लोंढे | Updated: April 17, 2024 15:15 IST

‘कोल्हापूरचे व्हिजन घेऊन काम करणार

कोल्हापूर : देशातील प्रगत जिल्ह्यात माझं कोल्हापूर खूप मागे राहिल्याची खंत मनात होती. अडीच-तीन वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे एक स्वप्न घेऊन कार्यरत राहिलो. निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांसह जनतेचा खूप आग्रह होता, पण लोकसभेची निवडणूक आहे, येथे राजकीय पक्षाची ताकद निर्णायक ठरत असते, त्यामुळे निवडणूकीत थांबण्याचा निर्णय घेतल्याची माहीती ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. नरके म्हणाले, गेली अडीच वर्षे बाराशेहून अधिक गावे पिंजून काढत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही वाड्यावस्त्या विकासापासून खूप लांब आहेत. हे जरी खरे असले तरी नियोजनबध्द विकास केला तर कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलू शकतो, या आत्मविश्वासाने काम करत गेलो. महाविकास आघाडीकडून उमेदवारी बऱ्यापैकी निश्चित झाल्याने वेगाने प्रचाराला लागलो होतो. पण, राजकारणात  काहीही होऊ शकते. उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते अस्वस्थत झाले. थांबायचे नाही, लढायचे असा आग्रह त्यांचा होता. त्याचबरोबर माझं कोल्हापूर माझं व्हिजन’ या संकल्पनेला जनतेतून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.  निवडणूक लढवण्याबाबत जनतेचाही आग्रह होता. मात्र, सहा विधानसभा मतदारसंघाचा हा मतदारसंघ आहे. अटीतटीच्या लढतीत पक्षीय ताकद महत्वाची असते यासह इतर बाबींचा विचार करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. हे सांगताना खूप वेदना होतात, आयुष्यातील तीन वर्षे कोल्हापूरच्या विकासाचे व्हीजन घेऊन खर्ची घातले आणि त्यानंतर थांबावे लागते. पण, आयुष्यात चार पावलांची झेप घेत असताना कधी कधी दोन पाऊले मागे यावे लागते. ७ मे ला मतदान झाल्यानंतर ८ मे पासून ‘चेतन युवा सेतू ’संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी, सत्यशील संदीप नरके उपस्थित होते.

माघारीचा निर्णय सांगताना झाले भावूकगेली अडीच वर्षे कोल्हापूरचे व्हीजन घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरलो होतो, कोल्हापूरच्या जनतेचे पाठबळ मिळत असताना माघार घ्यावी लागते, हे सांगताता डॉ. चेतन नरके हे भावूक झाले.

पाठींब्याबाबत लवकरच निर्णयनिवडणूकीतून माघार घेतली आहे, अद्याप पाठींब्याबाबत निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ असे डॉ. नरके यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण