शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

‘चिकोत्रा’त पाणी सोडणार

By admin | Published: October 04, 2015 12:47 AM

धोक्यात आलेल्या पिकांसाठी पाण्याची दोन आवर्तने

कोल्हापूर : चिकोत्रा धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील बाष्पीभवन तसेच अन्य कारणांनी वाया जाणारे पाणी वगळता २५० ते ३०० दक्षलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खोऱ्यातील धोक्यात आलेल्या पिकांसाठी पाण्याची दोन आवर्तने करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी (दि. २) जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत दिले. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहात चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. चिकोत्रा खोऱ्याला दोन आवर्तने दिल्यानंतर जे पाणी शिल्लक राहील, ते पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. पाण्याअभावी चिकोत्रा खोऱ्यातील ऊसपीक धोक्यात आले आहे. पिकांना वाचविण्यासाठी पाणी सोडण्याची गरज असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. तीन दिवसांपासून चिकोत्रा परिसरातही दमदार पाऊस सुुरू आहे. यामुळे पिकांना काहीसे जीवदान मिळाले आहे. त्यामुळे महिन्याभरानंतर पाण्याचे आवर्तन करण्याचाही निर्णय झाला. या परिसरातील उसाची तोड प्राधान्यक्रमाने केली जाईल, त्याबाबत साखर कारखान्यांना सूचना द्याव्यात. तसेच यापुढे ऊसाची लागवड करू नये, असा निर्णयही घेण्यात आला. दौलत कारखान्याच्या कर्जास हप्ते घालून देण्याची मागणीही मुश्रीफ यांनी केली. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. साळुंखे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, एस. एम. चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)