लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : असुविधांमुळे बदनाम झालेल्या कोल्हापूरला गतवैभव मिळवून देण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत योग्य उमेदवारांची निवड करा, असे आवाहन भारतीय जन संविधान मंचच्यावतीने करण्यात आले.
भारतीय जन संविधान मंचच्यावतीने रविवारी शाहू स्मारक भवनात ‘मी मतदार कोल्हापूर घडवणार’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हे चर्चासत्र झाले. निवडणुकीच्या तोंंडावर मतदारांना अनेक आश्वासने दिली जातात. थेट पाईपलाईन करू, मुबलक पाणी देऊ, चकचकीत रस्ते करू, परवडतील अशा आरोग्य सुविधा देऊ, शहर स्वच्छ ठेवू, ही आश्वासने दर पाच वर्षांनी मतदारांना ऐकायला मिळतात. मात्र, यातील काहीच होत नाही. आपण मात्र भूलथापांना बळी पडतो. आगामी महापालिका निवडणुकीत चांगल्या उमेदवारांच्या मागे उभे रहावे, यासाठी भारतीय जन संविधान मंच काम करेल, असे पारस ओसवाल यांनी सांगितले. यावेळी संजय पाटील, प्रसाद जाधव, विजयकुमार माने, जीवन बोडके, संदीप देसाई, गणेश लाड, सतीश मोरे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : भारतीय जन संविधान मंचच्यावतीने रविवारी शाहू स्मारक भवनात ‘मी मतदार कोल्हापूर घडवणार’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी पारस ओसवाल, जीवन बोडके, संदीप देसाई, प्रसाद जाधव, संजय पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-०७०२२०२१-कोल-भारतीय मंच) (छाया-नसीर अत्तार)