शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

राष्ट्रीय सुरक्षितेत नागरिकांचीही जबाबदारी, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:40 IST

अविचाराने पोस्ट फॉरवर्ड न करणेदेखील महत्त्वाचे

कोल्हापूर : राष्ट्रीय सुरक्षितता ही बाब केवळ लष्कर, वायू आणि नौदलाची जबाबदारी नाही, तर या देशातील सर्व नागरिकांचीही ही जबाबदारी आहे हे प्रथम लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले. शुक्रवारी येथील रोटरी परिषदेच्या उद्घाटनावेळी ‘राष्ट्रीय सुरक्षितता’ या विषयावर ते बोलत हाेते.नरवणे म्हणाले, आपल्या देशामध्ये विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कृती असलेले लोक राहतात. मक्याची रोटी एकीकडे आणि पुरणपोळी दुसरीकडे. इतकी भिन्नता असली तरीही आपण भारत म्हणून एक आहोत. भारतातील ही वैविधता ही केवळ प्रचाराची संकल्पना नाही तर ती आमच्या जीवनाचा भाग आहे. हीच विविधता आपली ताकद असून, आता अमृतकाळात तर प्रगतीचा वेग वाढला आहे.राष्ट्रीय सुरक्षितता हा विषय डोळ्यांसमोर आला की आपल्यासमोर लगेच सैनिक,रणगाडे, संचलन येते. परंतु, ही व्यापक संकल्पना आहे. केवळ सीमांचे संरक्षण नव्हे, तर या देशातील जमीन, ऊर्जा, पाणी, आरोग्य या सगळ्याचे संरक्षण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षितता आहे. त्यामुळे ही सुरक्षितता करताना प्रत्येक भारतीय नागरिकाची त्यामध्ये भूमिका असली पाहिजे. बाह्य आणि अंतर्गत अशा सुरक्षिततेमध्ये आपल्याला दोन्हीकडे सातत्याने लक्ष द्यावेच लागेल. अनेकदा देशांतर्गत असुरक्षितता असते ती लवकर कळत नाही. तिचे बाहेरून नियंत्रण होत असते.जसा आरेाग्यासाठी आपण विमा हप्ता भरतो तसाच निधी देशाच्या संरक्षणासाठीच्या निधीसाठीचा हप्ता असतो. आपल्या शेजाऱ्यांचे हेतू पाहता आपल्याला संरक्षणदृष्ट्या सिद्धच राहावे लागेल. सध्या सगळीकडे शांतता आहे मग लष्करावर इतका खर्च कशाला असे विचारले जाते. परंतु, ते योग्य नाही. कारण लष्करी सामर्थ्य एका रात्रीत उभे करता येत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे नियोजनपूवर्क खर्च करावा लागतो. ही एक प्रकारची गुंतवणूकही आहे. कारण देशांतर्गत संरक्षण उत्पादनांचे प्रमाण वाढले असून, तो पैसा देशातच राहतो.

शांतता हवी असेल तर युद्धसज्जता हवीच

पूर्वीपासून एक वाक्य सांगितले जाते की, ‘जर तुम्हाला शांतता हवी असेल तर युद्धसज्जता ठेवावीच लागते’. हे सत्य असून, त्यामुळेच गृहीत न धरता सर्व प्रकारची युद्धसज्जता ठेवण्याकडे भारताचा कल आहे. युक्रेनने याकडेच दुर्लक्ष केल्याने त्यांना ते महाग पडले. आपल्या देशाचे युद्ध झाले नाही तर आता जगात कुठेही युद्ध झाले तरी त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो हे वास्तव आहे.

अविचाराने पोस्ट फॉरवर्ड न करणेदेखील महत्त्वाचेराष्ट्राच्या सुरक्षिततेचा विचार करता नागरिकांनी समाजविघातक पोस्ट आणि मजकूर फॉरवर्ड न करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे असा टोलाही यावेळी नरवणे यांनी लगावला. रोटरीने या सर्व गोष्टी डोळ्यांसमोऱ ठेवून उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmanoj naravaneमनोज नरवणे