शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

इचलकरंजीत दिवसभर नागरिकांची ये-जा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:18 AM

इचलकरंजी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा कालावधी १५ जूनपर्यंत वाढविला आहे. सकाळी सात ते ...

इचलकरंजी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा कालावधी १५ जूनपर्यंत वाढविला आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवांची आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, अकरानंतरही नागरिक दिवसभर फिरत असल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असून, प्रशासन केवळ गांधारीची भूमिका घेत आहे.

शहर व परिसरात दररोज किमान ५० कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला थोपविण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. परंतु त्यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहे. शहरातील मुख्य मार्ग व चौक वगळता अन्य ठिकाणी कारवाई शून्य आहे. अकरानंतर शहरात विनाकारण फिरण्यास बंदी आहे. तरीही नागरिक अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण विनाकारण व विनामास्क फिरत आहेत. यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे; अन्यथा कोरोना संसर्ग रोखणे प्रशासनासमोर आव्हान ठरणार आहे.

चौकटी

कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज

शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे. एक-दोन दिवसांच्या कारवाईनंतर पथकाची कारवाई थंडावते. त्यामुळे नागरिक पुन्हा शहरात बिनधास्त फिरत असतात. यामुळे पथकाने करवाईमध्ये सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

अशाने कोरोना संसर्ग थांबणार कसा?

प्रशासनाकडून विनाकारण फिरणा-यांची रॅपिड अँटिजन चाचणी केली जात असून, यामध्ये काहीजण पॉझिटिव्ह येत आहेत. शहरात फिरणारे चार ते पाचजण पॉझिटिव्ह आढळत असल्याने कोरोना संसर्ग वाढतच जाणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग थांबणार कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागरिकांनाही खबरदारी घेण्याची गरज

प्रशासनाने केवळ सात ते अकरापर्यंत अत्यावश्यक खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु आस्थापना बंद झाल्यानंतरही विनाकारण अनेकजण फिरत असतात. केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडले पाहिजे. त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची काळजीपोटी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.