शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

मलकापुरात उड्डाणपूल बंद केल्याने वाहतूक कोंडी, स्थानिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2023 15:25 IST

उपमार्गासह महामार्गावर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क, मलकापूर : मलकापुरातील उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केल्याबरोबरच वाहतूक कोंडी होत आहे. उपमार्गासह महामार्गावर तीन किलोमीटर रांगा लागल्यामुळे स्थानिकांना चांगलाच फटका बसला. हा पूल पाडण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. मात्र, त्या अगोदरच वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शॉर्टकट जाण्याऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे.

कोल्हापूर नाका येथील उड्डाण पूल पाडण्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा हा नेहमीचाच विषय बनला होता. महामार्ग सहापदरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराने मलकापुरातील उड्डाणपूल पाडण्यासाठी अनेकवेळा वाहतुकीत बदल केले आहेत. वाहतुकीतील बदलानुसार शनिवारी शिवछावा चौकातील उड्डाणपूल वाहतुकीस बंद केला. सर्व वाहतूक दोन्ही उपमार्गांवरून वळवण्यात आली होती.

बघता-बघता काही वेळातच वाहतुकीची कोंडी होऊन उपमार्गांसह महामार्गावर तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तीन तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली असल्याने प्रवासी आणि वाहन चालक चांगलेच वैतागले होते. या ट्रॅफिक जामचा स्थानिक नागरिकांना चागलाच फटका बसत आहे. याशिवाय रोज विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी वाहने या वाहतूक कोंडीत अडकल्याने शालेय विद्यार्थ्यांनाही अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, यावेळी मुंबई-पुण्याला जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Malkapurमलकापूरmalkapur bypassमलकापूर बायपास