वडणगे : पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ प्रमाणे भरपाई द्या, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ५ सप्टेंबरला कृष्णा-पंचगंगा नदी संगमाजवळ जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनासंदर्भात शेट्टी यांनी वडणगे, प्रयाग चिखली आंबेवाडी, निगवे, भुयेवाडी, शिये येथील परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. जलसमाधी आंदोलनाची सुरुवात १ सप्टेंबरपासून क्षेत्र प्रयाग चिखली येथून पदयात्रेने करणार असल्याची माहितीही शेट्टी यांनी दिली. यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष -जनार्दन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष- वैभव दादा कांबळे, विक्रम पाटील , जि. प. माजी सदस्य बी. एच. पाटील, सरपंच सचिन चौगले, पं. स. सदस्य इंद्रजीत पाटील, राजू पोवार उपस्थित होते.
फोटो : २५ वडणगे शेट्टी
वडणगे (ता. करवीर) येथे स्वाभिमानी संघटनेच्यावतीने नियोजित जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.