शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Kolhapur News: शिवाजी विद्यापीठातील सिनेट बैठकीत गोंधळ, अभाविपचे कार्यकर्ते सभागृहात घुसले

By संदीप आडनाईक | Updated: March 10, 2023 13:51 IST

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी हस्तक्षेप करून चर्चा करण्याचे निमंत्रण दिले

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सिनेट बैठकीत सभा सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते घुसले आणि घोषणाबाजी करत महाविद्यालयीन निवडणुका झाल्याच पाहिजेत या मागणीसाठी सभागृहात बैठक मारून गोंधळ घातला. यासंदर्भात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी हस्तक्षेप करून या सभागृहात याबद्दल चर्चा करता येणार नाही असे सांगून १६ मार्च रोजी चर्चा करण्याचे निमंत्रण दिले.शिवाजी विद्यापीठाची अधिसभा बैठक सुरू झाल्यानंतर साडे बारा वाजण्याच्या सुमारास राजश्री शाहू सभागृहात घुसून अभविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी "भारत माता की जय", "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "आत्महत्याग्रस्त प्राध्यापकांना न्याय द्या", "विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका चालू होणार कधी?" अशा घोषणा  देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सुमारे पंधरा-सोळा कार्यकर्ते घुसले. महाविद्यालयीन निवडणुका घ्याव्यात आणि इतर मागण्यांसाठी फलक घेऊन कार्यकर्ते कुलगुरूंच्या समोर ठिय्या मारून बसले. सुमारे २० मिनिटे हा गोंधळ सभागृहात सुरू होता. सुरक्षारक्षकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. प्र कुलगुरू आणि कुलसचिव यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी आणि अधिसभा सदस्य ऍड. स्वागत परुळेकर यांनी समजावून सांगितले. कुलगुरू शिर्के यांनी अधिसभा बैठकीत बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल आणि पूर्वपरवानगी न घेतल्याबद्दल कानउघाडणी केली.  कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेऊन कुलगुरूंनी १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता चर्चेचे निमंत्रण दिले. यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देत सभागृह सोडले. या आंदोलनात प्रदेश सहमंत्री अमोघ कुलकर्णी, दिग्विजय गरड, दिनेश हुमनाबदे, रोहन कडोले, सूरज मालगावे, प्रविण डिगेकर, जय पाटील, पराग कुलकर्णी, गणेश डूबल सहभागी झाले होते.अभाविपच्या मागण्या

  • आत्महत्याग्रस्त प्राध्यापक यांच्या कुटुंबास योग्य ती आर्थिक मदत विद्यापीठाने करावी.
  • विद्यापीठातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना कायम करून घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा.
  • तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी.
  • वारंवार होणाऱ्या पेपरफुटीस जबाबदार अधिकर्यांवर कठोर कारवाई करावी
  • नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका या येत्या शैक्षणिक वर्षा २०२३-२४ साठी घेणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर करावे.
  • विद्यापीठातील सर्व प्रभारी पद्धतीने भरलेली पदे लवकरात लवकर कायमस्वरूपात भरावी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ