शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

‘दुटप्पीं’ना दूर केल्याने काँग्रेसला यश

By admin | Published: November 04, 2015 12:48 AM

पतंगराव कदम यांचा टोला : महानगरपालिका विजयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी

कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील सलग पराभवामुळे खचलेल्या काँग्रेसला महापालिकेच्या विजयामुळे नवसंजीवनी मिळाली. त्याचा भविष्यातील राजकारणासाठी नक्कीच लाभ होईल, असे गौरवोद्गार माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे निरीक्षक पतंगराव कदम यांनी काँग्रेस समिती कार्यालयात झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात काढले. या निवडणुकीत ‘आत एक आणि बाहेर दुसरेच’ करणाऱ्या प्रवृत्तीला पक्षाने दूर ठेवल्यामुळेच हे यश मिळाले, अशी खोचक टिपण्णी कदम यांनी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता केली. महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मंगळवारी काँग्रेस कार्यालयात कदम यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी ते बोलत होते.कदम म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात जे घडते ते राज्यात घडते आणि जे राज्यात घडते ते संपूर्ण देशात घडते म्हणून भविष्यातील काँग्रेसच्या राजकारणाला नवीन गती, संजीवनी देण्याचे काम कोल्हापूरच्या जनतेने केले. दररोज आढावा घेत गेलो. तिकीट वाटपसुद्धा सर्व संमतीने झाले म्हणूनच पक्षाला मोठे यश मिळाले. आपल्या पक्षात आपल्याच माणसांना पराभूत करणारी प्रवृत्ती असून हीच काँग्रेसची खरी गंमत आहे; परंतु यंदाच्या मनपा निवडणुकीत अशा प्रवृत्तींना बाजूला ठेवले. ज्यांनी ज्यांनी विरोधात काम केले, त्यांची नावे व घटना लेखी कळवा, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.’मनपा निवडणुकीत काँग्रेसला २३ टक्के मते मिळाली आहेत. ‘अच्छे दिन’च्या भूलथापांतून जनता बाहेर आल्यामुळे काँग्रेसला चांगले यश मिळाले. हे यश एकट्या सतेज पाटील यांचे नाही तर संयुक्तिक आहे, असे सांगत सतेज पाटील यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता तो टिकविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. प्रत्येक सहा महिन्यांनी प्रभागात ‘जनता दरबार’ घेऊन कामांचा आढावा घेतला जाईल आणि त्यास मी स्वत: उपस्थित राहीन, असेही कदम यांनी सांगितले. काँग्रेसमधून काही जणांना फोडण्याचा प्रयत्न झाला, पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉँग्रेस जनतेचा अजेंडा घेऊन मतदारांच्या दारात गेला. प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी दिशा दिली म्हणूनच हे यश मिळाले, असे सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी स्वागत केले. सरलाताई पाटील यांनी आभार मानले. समारंभास सुरेश कुराडे, ऋतुराज पाटील, संध्या घोटणे, प्रकाश सातपुते आदी उपस्थित होते.