शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

'मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत ढकले', आमदार पी. एन. पाटलांची भव्य पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 4:31 PM

मोदी सरकारने देशातील जनतेला महागाईच्या खाईत ढकलल्याचा घणाघाती आरोप आमदार पी. एन पाटील यांनी केला.

कोपार्डे : गेल्या ७० वर्षात काँग्रेसने सहकारी बँका, साखर कारखाने, बाजार समित्या, शिक्षण संस्था स्थापन करून खेडी व शेतकरी आर्थिक दृष्टीने समृद्ध केली. पण मोदी सरकारच्या काळात मोदीच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांच्यावर गाडी घालून ठार मारले. शेतकरी काय मोदी सरकारचे वैरी होते काय? असा सवाल आमदार पी. एन पाटील यांनी उपस्थितीत करत मोदी सरकारने देशातील जनतेला महागाईच्या खाईत ढकलल्याचा घणाघाती आरोप केला.आज बीड शेड ते क। बीड दरम्यान करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या महागाई विरोधातील पदयात्रानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार पाटील बोलत होते. यावेळी बंगळुरु मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याबद्दल निषेधाचा ठराव करण्यात आला. यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील,पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील,राजेंद्र सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार पाटील म्हणाले, काँग्रेसच्या विरोधात महागाई बद्दल गरळ ओकणाऱ्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचा दर १०० रूपयेच्यावर, घरगुती गँस एक हजार रुपये करून सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. शासकीय कंपन्या विकण्याचा धडाका लावला आहे. यावरून मोदी देश कोठे घेऊन गेले आहेत हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस सरकार आले तरच देश वाचणार असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दररोज एक तास जनतेत प्रबोधन करावे असे आवाहन केले.यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, सरपंच सत्यजित पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसPandurang Patilपांडुरंग पाटील