शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्ट्र कर्नाटक राज्यपाल यांच्या बैठकीतील तपशील जाहीर करा; काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी

By विश्वास पाटील | Updated: December 7, 2022 21:49 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  हे मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

विश्वास पाटील, कोल्हापूर: सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटककडून अन्याय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या राज्यपालांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली होती ? याचे  तपशील जाहीर करावेत अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज  पाटील यांनी बुधवारी पत्रकाद्वारे केली. आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  हे मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पत्रकात म्हटले आहे की, ४ नोव्हेंबर २०२२ रोजी इतिहासात कधी झाली नाही, अशी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या दोन्ही राज्यपालांची बैठक कोल्हापूरात झाली . त्याचा सविस्तर वृत्तांत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असेलच. तसेच तो वृत्तांत दोन्ही राज्य सरकारांकडेही नक्की पाठविला असणार आहे.  या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?  याची माहिती जनतेला कळणे गरजेचे आहे . एकीकडे अशी बैठक होते आणि दुसरीकडे मात्र मराठी भाषिकांची मुस्कटदाबी केली जाते, यामागे  नेमके गौडबंगाल काय आहे?   त्यामुळे दोन्ही राज्यपालांच्या बैठकीतील चर्चेची माहिती  जनतेसमोर यावी .

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  हे मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये  करत आहेत. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  बेळगांव, कारवार, बिदर या भागातील सुमारे २५ विधानसभा मतदारसंघातील कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेवून मुद्दामहून ते अशी वक्तव्ये करत आहेत. ते सोलापुरात येऊन गेले पण त्या ठिकाणी कर्नाटक भवन बद्दल फार काही बोलले नाहीत पण कोल्हापुरात कार्यक्रमाला आले असता कोल्हापूरमध्ये कर्नाटक भवन बांधणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, हे लोकांना नक्की कळले आहे. 

सौंदती यात्रेला गेलेल्या भक्तांची सुरक्षा ठेवा 

दरवर्षी प्रमाणे  कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेला कोल्हापुरातील लाखो भाविक गेले आहेत. सीमा वादाच्या सध्याच्या या तणावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती डोंगरावर गेलेल्या तसेच यात्रेला जाणार आहेत ,अशा कोल्हापुरातील रेणुका भक्तांची  योग्य ती सुरक्षा घेण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत ,अशी मागणी करणारे पत्र आमदार पाटील यांनी बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठविले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलborder disputeसीमा वाद