शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

काँग्रेस-राष्ट्रवादीचे जहाज बुडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2015 12:24 AM

महेश जाधव : भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार यशोदा मोहिते यांची प्रचार सभा

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार आहे. हे बुडते जहाज पाहूनच जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे सुरक्षित बेटावर राहिले आहेत, अशी टीका भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी केली.भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार यशोदा प्रकाश मोहिते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. जाधव म्हणाले, महानगरपालिकेच्या राजकारणात उतरलेला जनसुराज्य शक्ती पक्षदेखील गेली दहा वर्षे सत्तेत सहभागी होता. यंदाची निवडणूक जनसुराज्य आणि राष्ट्रवादी एकत्रित लढत आहेत; परंतु या पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे महापालिकेत उडालेला गोंधळ, माजलेली बजबजपुरी, ढपला संस्कृती आणि जनतेच्या डोळ्यांत होत असलेली धूळफेक याची विनय कोरे यांना पूर्णपणे जाणीव आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे जहाज बुडणार याचा अंदाज आल्याने कोरे यांनी सुरक्षितस्थळावर राहण्याचा निर्णय घेतला असावा.ते पुढे म्हणाले, महापालिकेवर भाजप-ताराराणी महायुतीची सत्ता येणार हे निश्चित असून यासाठी जनतेनेच पुढाकार घेतला आहे. गेली दहा वर्षे महापालिकेत सुरू असलेली ढपलेबाजी, टक्केवारी, पाकीट संस्कृती, लँड माफियांचा धुमाकूळ, नेत्यांची हुकूमशाही या प्रकारामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भुईसपाट होणार यात शंका नाही. यावेळी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)