शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भारत जोडो नव्हे तर.., भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची काँग्रेसवर टीका

By भीमगोंड देसाई | Published: October 29, 2022 4:20 PM

महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपावर शायना म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक घेत असतात. राजकीय नेते हे ठरवू शकत नाहीत.

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो नव्हे तर पक्ष, परिवार जोडो यात्रा आहे. मतदारांनाही हे चांगले माहीत आहे. म्हणून प्रत्येक निवडणुकीत भाजपलाच जनाधार मिळत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर हल्लाबोल्ल चढवला.शायना म्हणाल्या, काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा पक्ष वाचविण्यासाठी यात्रा काढावी. काँग्रेसकडे सक्षम विरोधी पक्ष होण्याचीही ताकद राहिलेली नाही. आता हा पक्ष प्रादेशिक बनत चालला आहे. भारत जोडो यात्रे़चे स्वागत शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातर्फे महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी शिल्लक आहे कोठे?गुजरातची जनता केजरीवालांना भुलणार नाहीगुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांचे राजकारण करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नोटांवर देवदेवतांचे फोटो छापण्याची मागणी करीत आहेत. मात्र यास गुजरातची जनता भुलणार नाही. भाजपचा अजेंडा हा सबका साथ सबका विकासचा आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईत कोणाची ताकत आहे, हे शिवसेना ठाकरे गटालाही कळून चुकेल.उद्योजक ठरवतात, नेते नव्हेमहाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपावर शायना म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक घेत असतात. राजकीय नेत हे ठरवू शकत नाहीत. यामुळे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेले या आरोपात काही तथ्य नाही...तेच लोक यंत्रणाच्या कारवाईसंबंधी चुकीचा संदेश पसरवत आहेतईडी आणि सीबीआय स्वतंत्र यंत्रणा आहेत. या संस्थांतर्फे चुकीचे काम केलेल्यांवर कारवाई होत आहे. ज्यांनी चुकीचे काम केले नाहीत, त्यांनी या यंत्रणांना घाबरण्याची गरज नाही. दाल मे कुछ काला है असेच लोक या यंत्रणाच्या कारवाईसंबंधी चुकीचा संदेश पसरवत आहेत, असेही शायना यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, जायंटसचे गिरीश चितळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा