शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

"के.पी यांनी बिद्रीसाठी केलेले रचनात्मक कार्य कौतुकास्पद- डाॅ. डी. वाय पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 15:35 IST

५९ व्या गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ

- दत्ता लोकरे

सरवडे : गेल्या सतरा वर्षात के. पी. पाटील यांनी अध्यक्षपदाची व ४० वर्षे संचालक म्हणून धूरा सांभाळून  अनेक अडचणींना सामोरे जात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी व संचालक मंडळाने केलेले रचनात्मक कार्य कौतूकास्पद आहे.  त्यांच्याच नेतृत्वाखाली बिद्री साखर कारखाना यापुढेही प्रचंड प्रगती साधेल, असा विश्वास माजी राज्यपाल डाॅ. डी. वाय. पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.

बिद्री (ता. कागल) येथील  दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या गळीत हंगामाचा त्यांच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. तत्पुर्वी ऊस तोडणीचा शुभारंभ संचालक अशोक कांबळे यांच्या हस्ते तर काटा पुजन संचालक एकनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गव्हाणीचे विधीवत पुजन संचालक राजेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी  निर्मलादेवी पाटील या उभयतांच्या हस्ते झाले.

के. पी. पाटील म्हणाले,  बिद्री कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम पुर्ण झाले आहे. येत्या तीन - चार दिवसात गाळपास प्रारंभ केला जाईल. यावर्षी ऊसाची उपलब्धता मुबलक आहे.  त्यानुसार तोडणी नियोजन केले आहे. बीड भागातील पावणेदोनशे टोळ्या कारखान्यावर दाखल झाल्या आहेत. स्थानिक व बोहेरील टोळ्यांच्या माध्यमातून तोडणी यंत्रणा सक्षम केली जाईल.  त्यामुळे तोडणी व वाहतुकीची अडचण निर्माण होणार नाही. बिद्रीच्या व्यवस्थापनावर तमाम सभासदांचा प्रचंड विश्वास आहे. कारखान्याकडे २७ कोटीच्या ठेवी स्वेच्छेने ठेवून कारखान्यावरील विश्वास दृढ केला आहे.

या समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक सर्वश्री ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदुम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रविण भोसले, मधुकर देसाई, के.ना.पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील, जगदीश पाटील, संचालिका नीताराणी सुनिलराज सुर्यवंशी, अर्चना विकास पाटील, कामगार संचालक भिमराव किल्लेदार व शिवाजी केसरकर, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांच्यासह आजी – माजी संचालक, तोडणी – वाहतुक कंत्राटदार, ट्रक, ट्रँक्टर चालक वाहक, तोडणी – वाहतुक कामगार, कारखानांतर्गत विविध कामांचे ठेकेदार, कामगार, सभासद चार तालूक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.  कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.पालकमंत्री सतेज पाटील महाराष्ट्राचे नेतृत्व करतील : के.पी.पाटीलपालकमंत्री सतेज पाटील उठावदार व प्रभावशाली काम शासनाच्या वतीने करत आहेत. त्यामुळे निश्चितच ते राज्याचे नेतृत्व करतील आणि ते पहाणे  आम्हाला आनंददायी वाटेल असे के.पी.पाटील यांनी  म्हणताच उपस्थितीतात अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कामगारांना वेतनवाढ पुढील महिन्यात : कामगारांच्या उत्साहसाखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढीचा निर्णय शासनाने घेतला आहे. साखर कारखानदारीत अनेक अडचणी असल्या तरी कामगारांच्या हितासाठी बिद्री कायमच अग्रेसर असून बिद्री साखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय व गतवर्षीचा बोनसबाबत चर्चा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. वेतनवाढीची अंमलबजावणी पुढील पगारापासून केली जाईल तर वेतनवाढीच्या फरकाची रक्कम तीन टप्प्यात दिली जाईल असे आश्वासन गळीत हंगाम समारंभात अध्यक्ष पाटील यांनी दिले. वेतनवाढ अंमलबजावणीची अध्यक्ष पाटील यांनी घोषणा केल्याने बिद्रीच्या कामगारांमध्ये उत्साह पसरला आहे.