शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कांद्याबरोबर तेलाच्या फोडणीचा ग्राहकांना चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 15:45 IST

गेली महिना-दीड महिना कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असताना, आता सरकी तेलाचा चटका सहन करावा लागत आहे. किरकोळ बाजारात सरकी तेलाचा दर प्रतिकिलो ९४ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याभरात भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असून, वांगी २० रुपये किलोपर्यंत खाली आली आहेत.

ठळक मुद्देसरकी तेलाची शंभरीकडे वाटचाल भाजीपाल्याच्या दरात मात्र घसरण

कोल्हापूर : गेली महिना-दीड महिना कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असताना, आता सरकी तेलाचा चटका सहन करावा लागत आहे. किरकोळ बाजारात सरकी तेलाचा दर प्रतिकिलो ९४ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याभरात भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असून, वांगी २० रुपये किलोपर्यंत खाली आली आहेत.कांद्याने १५0 रुपये पार केल्याने स्वयंपाकातून कांदाच गायब झाला आहे. घाऊक बाजारात २० ते १५० रुपये प्रतिकिलो कांदा असला, तरी किरकोळ बाजारात ५० पासून पुढे कांद्याचा दर आहे. खराब कांदा ५० रुपयांनी घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. एक नंबर प्रतीच्या कांद्याला हात लावता येत नाही. बटाट्याचे दर मात्र स्थिर असून, २० रुपये किलो दर कायम राहिला आहे.

महापूर आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनसह इतर तेलबियांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचा परिणाम सध्या दिसत असून, सरकी तेलाच्या दरात वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात ८८ रुपये किलो असणारे तेल आता ९४ रुपयांवर पोहोचला असून, शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे. साखर ३८ रुपयांवर स्थिर असून, तूरडाळ १००, मूग डाळ १००, मूग ८८, मटकी १२० रुपये किलो आहे. ज्वारीच्या दरात वाढ होऊ लागली असून, प्रतिकिलो ४० रुपयांच्या पुढे दर पोहोचला आहे.भाजीपाल्याचे दर आवाक्यात आले असून, किरकोळ बाजारात ८० रुपये किलोवर पोहोचलेल्या भाज्या ४० रुपयांवर आल्या आहेत. वांग्याचा दर ४० ते ६० रुपये किलो होता. तो आता २० ते ३० रुपयांवर खाली आला आहे. गवार ४० रुपये, ओला वाटाणा ५०, तर वरणा ४० रुपये किलो आहे. दोडका, ढब्बू, कोबीचे दर स्थिर आहेत. टोमॅटोच्या दरात घसरण झाली असून, बाजार समितीत रोज तीन हजार कॅरेटची आवक होते. हरभरा पेंढीबरोबरच हरभरा भाजीची आवकही वाढली आहे.कोथिंबिरीच्या दरात घसरणगेले महिनाभर कोथिंबिरीचा दर ५० रुपये पेंढीपर्यंत गेला होता. आता आवक वाढली असून, रविवारी बाजार समितीत २५ हजार पेंढ्यांची आवक झाल्याने दर घसरले. सध्या १0 रुपये पेंढी दर राहिला.

 

गेल्या चार-पाच वर्षांत सरकी तेलाच्या दरात एवढी वाढ पहिल्यांदाच झाली आहे. कांद्यासह डाळीचे दरही तेजीत असल्याने एकूणच व्यवसायावर परिणाम झाला आहे.- संजय नाकील,व्यापारी

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर