शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Kolhapur: बालिंगा पुलावरुन वाद, मजबुतीकरण करूनही पुल धोकादायक कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 15:25 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१९ मध्ये ४५ लाख रूपये खर्च झाले कशावर?

प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असणाऱ्या बालिंगा तेथील १८८५ मध्ये बांधलेला रिव्हज पूल धोकादायक असल्याचे कारण सांगून मंगळवारी दि.२६ पासून बंद केला. मात्र, दोन-तीन वर्षापूर्वी या पुलाचे मजबुतीकरण केले असून, तो आता धोकादायक झाला कसा असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.पुलाच्या सर्व पीलरचे बेंगलोरच्या कंपनीकडून २०१९ मध्ये वॉटर इन्सपेक्शन करण्यात आले. यात मध्यभागी असणाऱ्या नदीपात्रातील पिलरच्या पाया भोवतीचे दगड निखळल्याचे लक्षात आल्यानंतर पाया मजबूत करण्यासाठी कामाची निविदा काढली होती. चिपळूणच्या प्रभू इंजिनिअरिंग कंपनीने या कामाचा ठेका घेतला होता. त्यांनी मुंबई येथील वसंत धडके या उपठेकेदाराला हे काम दिले होते. ४६ लाखाचे हे काम होते. या कामासाठी पिलरच्या भोवती मुरुम, दगड,मातीचा २५ ते २७ फूट पूलाच्या पुर्वेकडील पिलर भोवती भराव टाकण्यात आले.पुलाचे काम करताना अंडर वॉटर सिस्टीम या अंत्यत उच्च प्रतीचे तंत्रज्ञानाचा वापर करून मायक्रो काँक्रीटीकरण करण्यात आले.या द्वारे पीलरना काँक्रीट जँकेट होणार असल्याने पुराच्या प्रवाहाचा धोका कमी होणार असून पुलाचे आयुष्य वाढणार आहे असे सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता रविंद्र येडगे यांनी सांगितले होते. 

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल मजबूत कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या सात ब्रिटिशकालीन फुलांपैकी बालिंगा येथील रिव्हर्स पूल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मजबूत असल्याचे तात्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते यानंतरही या फुलाची मजबूत करण्याचे काम झाले होते असे असताना पूल धोकादायक कसा असा प्रश्न जनतेला पडला आहे.दोन वर्षांपूर्वी पुलाच्या मजबुतीकरणाचे काम करूनही पूल धोकादायक कसा?

राष्ट्रीय महामार्ग अनभिज्ञ१८८५ ला हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे पिलरचे दगड निखळले असण्याची तसेच दोन दगडांमध्ये फटी निर्माण झाल्या असण्याची शक्यता आहे. पुराच्या वेगवान पाण्याचा प्रवाहाचा परिणाम पिलरवर होऊन पुलाला धोका निर्माण होऊ शकतो, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण, २०१९-२० मध्ये या पुलाच्या पिलरच्या दोन दगडांमधील फटी बुजवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून मायक्रो काँक्रिटीकरण केले आहे. पुलाच्या पायाशी काँक्रीट जॅकेट केले आहे. ही माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतलेली नाही का? पुलाला धोका आहे, अशी भीती निर्माण करून राष्ट्रीय महामार्ग बंद करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बालिंगा पुलाची माहितीनिर्मिती - सन १८८५एकूण गाळे - ५लांबी - १०२.५ मीटररुंदी - १० मीटरबांधकाम वर्ष - १८८५रुंदीकरण - २००५

तालुका -करवीर,राधानगरी, पन्हाळा,शाहूवाडी,तळकोकणात प्रवासी व अवजड माल वाहतूकवाहतूक (दिवसभरात)दुचाकी -८००० ते १०,०००अवजड-१०००कार -४०००प्रवासी वहाने २ ते ४ हजार 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर