शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

संसर्गाला परतावण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:19 AM

कोल्हापूर : रोज भाजीपाला खरेदीसाठी अथवा किरकोळ कारणांसह विनाकारण फिरून संसर्ग वाढवू नये. अत्यावश्यक कारण असेल तरच बाहेर पडावे, ...

कोल्हापूर : रोज भाजीपाला खरेदीसाठी अथवा किरकोळ कारणांसह विनाकारण फिरून संसर्ग वाढवू नये. अत्यावश्यक कारण असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा शेवटच्या टप्प्यातही मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल. संसर्गाची लाट रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी केले.

पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. पोलीस कर्मचारी चोवीस तास रस्त्यावर बंदोबस्त करीत आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातून एक लाख लोकांनी प्रशासनाने घातलेली नियम पायदळी तुडवली आहे. अशा लोकांवर कारवाई करीत पोलिसांनी कोट्यवधीचा महसूल दंड रूपाने गोळा केला आहे. तरीसुद्धा अगदी दोन टक्के लोक रोज भाजीपाला खरेदी व अन्य छोट्या कारणांसाठी रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाची पाॅझिटिव्हिटी कमी होत नाही. रोज १५०० च्या आसपास रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी इतके दिवस संयमाने काढले आहे. हा संयम यापुढेही कायम ठेवून दुसरी लाट थोपविण्याचे काम करावे. घरात बसूनच आतापर्यंत जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे. यापुढेही संयम बाळगून सहकार्य करावे. जे लोक यापुढेही विनाकारण फिरतील त्यांच्यावर पोलीस दल कडक कारवाई करेल, असेही पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी स्पष्ट केले.